शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दोन दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:22 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़

विजय मोरे ।नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान १५ जीवघेणे अपघात होत असून, यात मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ वाढती अपघातांची संख्या लक्षात घेता ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’बरोबर ‘सुरक्षित नाशिक’चाही विचार करणे गरजेचे झाले आहे़  शहरातील वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे शहर दिवसेंदिवस ‘अनसेफ ’ होत चालले की काय अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे़ गतवर्षी शहरात १४९ जीवघेणे अपघात घडले होते, तर यावर्षी २५ डिसेंबरपर्यंत १६३ जीवघेणे अपघात घडले आहेत़ यामध्ये दुचाकी अपघातांचे व दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याची संख्या तुलनेने अधिक आहे़ डोक्याला मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले असून, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे आवश्यक असते़ यासाठी शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार वर्षभरापासून हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे़  वर्षानुवर्षे काही वाहनधारक वाहनांची देखभाल दुरुस्तीच करीत नाहीत़ कार्यालयातून घरी जाणाºया नोकरदारांची होणारी घाईगर्दी, बंद सिग्नल, सिग्नलची सदोष यंत्रणा, पोलीस कर्मचाºयांचे दुर्लक्ष आणि वाहनधारकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरातील सिग्नलवरील किरकोळ अपघातांमध्येही वाढ झाली आहे़ मानवी चुकांमुळे  ८४ टक्के अपघात देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ प्रत्येक दिवशी सरासरी ४० लोक मरण पावतात़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटातील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे चौकशीअंती समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक