शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दोन दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:22 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़

विजय मोरे ।नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान १५ जीवघेणे अपघात होत असून, यात मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ वाढती अपघातांची संख्या लक्षात घेता ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’बरोबर ‘सुरक्षित नाशिक’चाही विचार करणे गरजेचे झाले आहे़  शहरातील वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे शहर दिवसेंदिवस ‘अनसेफ ’ होत चालले की काय अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे़ गतवर्षी शहरात १४९ जीवघेणे अपघात घडले होते, तर यावर्षी २५ डिसेंबरपर्यंत १६३ जीवघेणे अपघात घडले आहेत़ यामध्ये दुचाकी अपघातांचे व दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याची संख्या तुलनेने अधिक आहे़ डोक्याला मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले असून, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे आवश्यक असते़ यासाठी शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार वर्षभरापासून हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे़  वर्षानुवर्षे काही वाहनधारक वाहनांची देखभाल दुरुस्तीच करीत नाहीत़ कार्यालयातून घरी जाणाºया नोकरदारांची होणारी घाईगर्दी, बंद सिग्नल, सिग्नलची सदोष यंत्रणा, पोलीस कर्मचाºयांचे दुर्लक्ष आणि वाहनधारकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरातील सिग्नलवरील किरकोळ अपघातांमध्येही वाढ झाली आहे़ मानवी चुकांमुळे  ८४ टक्के अपघात देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ प्रत्येक दिवशी सरासरी ४० लोक मरण पावतात़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटातील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे चौकशीअंती समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक