शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अडीच हजार शेतकरी कृषिसाक्षर

By admin | Updated: May 6, 2017 01:46 IST

नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने आत्तापर्यंत सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन केले आहे.

संदीप भालेराव । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कृषी शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने आत्तापर्यंत सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन केले आहे. निवासी शिबिरे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी तंत्रज्ञान पोहचविले जात असून, आधुनिक संपर्क साधनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठ पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. मुक्त विद्यापीठाच्या कृषी संशोधन विभागाच्या माध्यमातून कृषी शिक्षणक्रम चालविले जातात. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे एक लाख २० हजार तरुण शेतीकडे वळले असल्याचा दावा मुक्तविद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाशी संलग्न कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठाकडून अनेक कार्यक्रम तयार करण्यात आले आहे. शेतीविषयक साक्षरता वाढविण्यासाठी शेतकरी, शेती करू शकणारे तरुण आणि कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचारी अशा तीन पातळ्यांवर कृषी विषयक प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांसाठी निवासी शिबिरे तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कृषिविषयक मार्गदर्शन करण्याचा उपक्रम विद्यापीठ राबवित आहे. अशाप्रकारचे प्रशिक्षण राबविण्यासाठी वर्षभराचे नियोजन केले जाते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन बघून शेतकऱ्यांनी पीक, माती परीक्षण, उपाययोजना, कृषी व्यवस्थापन आणि लागवड या पातळीवर मार्गदर्शन केले जाते. हंगामात कोणते पीक घ्यावे, त्याची काळजी, औषधे, नियोजन आदिंबाबत शेतकऱ्यांना शिबिरात मार्गदर्शन केले जाते, तर बांधावर जाऊन कृषी विद्यापीठांच्या संशोधनाची माहिती सहप्रयोग दिली जाते. शेतकऱ्यांच्या शिबिरासाठी संपर्क शेतकऱ्याची निवड केली जाते. तो संपर्क शेतकरी हंगाम आणि गावातील पिकानुसार प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करतो आणि त्यानंतर विद्यापीठ त्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सुरू करते. शेतकऱ्यांची निवड होऊन त्यांना विद्यापीठ आवारात निवासी प्रशिक्षण दिले जाते. तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी विस्तार हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने कृषी सल्ला आणि साक्षरता यातून शेतकरी विद्यापीठाशी जोडले गेले आहेत.