शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील अडीच लाख रुग्ण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

नाशिक: केारोनाचा सामना करीत नाशिक जिल्ह्यासह विभागात कोरोना नियंत्रणात आहे. विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, ...

नाशिक: केारोनाचा सामना करीत नाशिक जिल्ह्यासह विभागात कोरोना नियंत्रणात आहे. विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, मृत्युदर १.९० टक्के इतका आहे. चारही जिल्ह्यांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे.

विभागातून आजपर्यंत दोन लाख ५३ हजार ३६९ रुग्णांपैकी २ लाख ४४ हजार १५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ४ हजार ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३६ आहे, तर मृत्युदर १.९० टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडल कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी दिली आहे.

विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये १० लाख ६० हजार ८८३ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी २ लाख ५३ हजार ३६९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच ६ हजार १३६ व्यक्ति होम क्वारंटाईन तर ३८५ व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.

---इन्फो--

नाशिक जिल्हा : १ लाख ३ हजार २८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ७ हजार ८१९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३ हजार २८६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के इतके आहे. आजपर्यंत १ हजार ९२३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जळगांव : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के, आजपर्यंत ५५ हजार ४६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५३ हजार ७५२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३८९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार ३१९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

धुळे जिल्हा: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के, धुळे जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार ३५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३ हजार ७४१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के इतके आहे. आजपर्यंत ३८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

अहमदनगर: 642 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगरला आजपर्यंत ६७ हजार ८५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६ हजार १९२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६४२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार ०२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

नंदुरबार: जिल्ह्यात 529 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ८७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७ हजार १८० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१८ टक्के इतके आहे. आजपर्यंत १६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.