शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विभागातील अडीच लाख रुग्ण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

नाशिक: केारोनाचा सामना करीत नाशिक जिल्ह्यासह विभागात कोरोना नियंत्रणात आहे. विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, ...

नाशिक: केारोनाचा सामना करीत नाशिक जिल्ह्यासह विभागात कोरोना नियंत्रणात आहे. विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, मृत्युदर १.९० टक्के इतका आहे. चारही जिल्ह्यांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे.

विभागातून आजपर्यंत दोन लाख ५३ हजार ३६९ रुग्णांपैकी २ लाख ४४ हजार १५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ४ हजार ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३६ आहे, तर मृत्युदर १.९० टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडल कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी दिली आहे.

विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये १० लाख ६० हजार ८८३ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी २ लाख ५३ हजार ३६९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच ६ हजार १३६ व्यक्ति होम क्वारंटाईन तर ३८५ व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.

---इन्फो--

नाशिक जिल्हा : १ लाख ३ हजार २८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ७ हजार ८१९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३ हजार २८६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के इतके आहे. आजपर्यंत १ हजार ९२३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जळगांव : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के, आजपर्यंत ५५ हजार ४६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५३ हजार ७५२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३८९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार ३१९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

धुळे जिल्हा: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के, धुळे जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार ३५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३ हजार ७४१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के इतके आहे. आजपर्यंत ३८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

अहमदनगर: 642 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगरला आजपर्यंत ६७ हजार ८५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६ हजार १९२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६४२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार ०२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

नंदुरबार: जिल्ह्यात 529 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ८७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७ हजार १८० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१८ टक्के इतके आहे. आजपर्यंत १६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.