शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पंचवीस वर्षे मागे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; माधव भंडारी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 15:16 IST

नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या  काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे भंडारी म्हणाले.

ठळक मुद्देभाजप नेते माधव भंडारी यांचा आरोपमहाविकास आघाडी सरकारवर टीका

नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या  काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे भंडारी म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर भंडारी यांनी भाजपच्या वसंत स्मृती कायार्लयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी व्यासपीठावर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या कृषी विधेयकास शेतकरी विरोधी म्हणायचे आणि राज्यात मात्र याच शेतकऱ्यांचा कृषी उतन्न समितीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घ्यायचा हा शेतकऱ्यांच्या संदर्भातील दुटप्पीपणा असल्याचा आराेप  भंडारी यांनी केला आहे. तसेच केंद्राने कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र राज्य सरकारचे नियोजन अपुरे पडल्याने तब्बल ४६ हजार रूग्णांचे बळी गेले आहेत. केंद्राने दिलेल्या निधीचा विनीयोग नक्की कसा केला हे राज्य सरकारने जाहीर करावे असेही भंडारी म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाShiv Senaशिवसेना