शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

१२ हजार कोटींची वीजचोरी, भ्रष्टाचार लपविण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट वीज बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:56 IST

नाशिक : महावितरणने शेतकऱ्यांच्या माथी दुप्पट वीज मारून सोयीस्कररीत्या दरवर्षीची होणारी १२ हजार कोटींची वीजचोरी व भ्रष्टाचार लपविण्याचा घाट ...

नाशिक : महावितरणने शेतकऱ्यांच्या माथी दुप्पट वीज मारून सोयीस्कररीत्या दरवर्षीची होणारी १२ हजार कोटींची वीजचोरी व भ्रष्टाचार लपविण्याचा घाट घातला असून, या मनमानीला सरकारकडून चाप लावण्याचा प्रयत्न होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे रविवारी (दि. ९) महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राठी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.

महावितरण शेतकऱ्यांचा वीज वापर दुप्पट दाखवत असून, कंपनी शेतकरी व राज्य सरकार या दोघांचीही लूट करीत असून, सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी प्रथम वीज बिले व थकबाकी दुरुस्तीसाठी तक्रार अर्ज दाखल करावेत. बिल दुरुस्तीनंतरच सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन होगाडे यांनी शेतीपंप वीज ग्राहकांना यावेळी केले. जाहीर सवलत योजनेप्रमाणे खरी बिले निश्चित करून ५०टक्के सवलत दिली, तर अंदाजे सहा हजार कोटी इतकीच रक्कम जमा होणार असून, या योजनेत पाच वर्षांचे व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे व्याजासह वसुलीपात्र थकबाकी कमाल आठ ते नऊ हजार कोटी होऊ शकते असेही त्यांनी नमूद केले. यावेळी चेंबरचे मुकुंद माळी, वीज ग्राहक समितीचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ वर्मा, चेंबरचे पदाधिकारी कैलास आहेर, संजय राठी उपस्थित होते.

माहिती असूनही सरकारचा कानाडोळा

शेतीपंप वीज विक्री हे गळती, चोरी व भ्रष्टाचार लपविण्यासाठी सोयीस्कर ठिकाण असल्याचे नमूद करतानाच शेतीपंपांचा वीजवापर ३१ टक्के व वितरण गळती १५ टक्के आहे, असा दावा कंपनीने केला आहे. वस्तुस्थिती याउलट असून, शेती पंपांचा खरा वीजवापर १५ टक्के असून, गळती किमान ३० टक्के अथवा त्याहूनही अधिक आहे. याविषयी माहिती लपविली जात असल्याचा आरोपही होगाडे यांनी केला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज