शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पहिनेच्या जंगलात बारा तास आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:43 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरीत्या घुसखोरी करत, भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धूम्रपान करत फेकलेल्या सिगारेटच्या थोटकांमुळे मोठा कृत्रिम वणवा भडकला. भडकलेली आग विझविताना वनकर्मचारी व सुमारे दीडशे ग्रामस्थांच्या नाकीनव आले. शनिवारी (दि.६) पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सुमारे ३७ हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले, तसेच सुमारे २० ते २५ हजार रोपे नष्ट झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या कृत्रिम वणव्यात जैवविविधतेची अपरिमित हानी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे३७ हेक्टर वनक्षेत्र खाक : दीडशे गावकऱ्यांसह वनकर्मचाऱ्यांचे रात्रभर शर्थीचे प्रयत्न

नाशिक : त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरीत्या घुसखोरी करत, भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धूम्रपान करत फेकलेल्या सिगारेटच्या थोटकांमुळे मोठा कृत्रिम वणवा भडकला. भडकलेली आग विझविताना वनकर्मचारी व सुमारे दीडशे ग्रामस्थांच्या नाकीनव आले. शनिवारी (दि.६) पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सुमारे ३७ हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले, तसेच सुमारे २० ते २५ हजार रोपे नष्ट झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या कृत्रिम वणव्यात जैवविविधतेची अपरिमित हानी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.मार्च महिन्याला प्रारंभ झाल्याने उन्हाच्या झळा अतितीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहे. शहरासह जिल्ह्यातील पारा वेगाने वाढत असल्यामुळे जंगलातील रानगवत वाळून एखाद्या ज्वलनशील पदार्थांइतकेच घातक झाले आहे. यामुळे या गवताचा ज्वलनशील घटकांशी संबंध येताच कृत्रिम वणवे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात मागील आठवडाभरापासून भडकत आहे. पहिने गावाचा परिसर निसर्गरम्य असून, पावसाळ्यासह बारामाही हा भाग शहरी नागरिकांना आकर्षित करत असतो. येथील डोंगररांगा व राखीव वनांमध्ये भटकंतीसाठी तरुणाई जात असते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पहिनेजवळी राखीव वनाभोवती महाविद्यालयीन दोघा तरुणांनी धूम्रपान करत दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे मोठी आग भडकली. पहिनेच्या ३५३ गटात भडकलेल्या या मानवनिर्मित वणव्यामध्ये सुमारे दोन वर्षे वाढ झालेली हजारो रोपे होरपळून राख झाली. वाळलेले गवत आणि पाळापाचोळा वेगाने पेटू लागल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत, त्र्यंबकेश्वर वन कर्मचाऱ्यांना माहिती कळविली. माहिती मिळताच पारंपरिक पद्धतीने आग विझविण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली.राखीव वनात बारा तास आगीचे तांडवपंधरा ते वीस वनर्कमचारी आणि दीडशे गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालत रात्रीच्या काळोखात आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. झाडांच्या तोडलेल्या ओल्या फांद्यांची ह्यझाडूह्ण तयार करत झोडपणी करून पेटलेले गवत विझवित होते. मात्र, वारा रात्री प्रचंड सुटल्याने भडकलेली आग काही करता शमत नव्हती. शुक्रवारी (दि.५) संध्याकाळी सात वाजल्यापासून भडकलेली आग शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत विझता विझत नव्हती. या आगीवर शनिवारी सकाळी आठ वाजता पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास यश आले.दोघे संशयित ताब्यात; दोघे फरारगावकऱ्यांच्या मदतीने संशयित सौरभ संदीपान पवार, चंद्रकांत भट्टू महाले या दोघा संशयित तरुणांना वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. त्यांचे दोन साथीदार मित्र मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या दोघांना इगतपुरी तालुका न्यायालयात शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. पवार व महाले हे त्यांच्या दोन मित्रांसह राखीव वनाजवळ मद्यपान-धूम्रपान करत होते, यावेळी त्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. हे दोघेही युवक वैद्यकीय शाखेच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.फोटो आर वर ०६फायर नावाने

टॅग्स :Fairजत्राCrime Newsगुन्हेगारी