शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

तुकाराम मुंढे चुकीचे, की राधाकृष्ण गमे बरोबर?

By संजय पाठक | Updated: June 22, 2019 16:55 IST

नाशिक- महापालिकेत ज्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली ते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले राधाकृष्ण गमे हे अत्यंत परिपक्व अधिकारी मानले जातात. महसुल सेवेचा अनुभव असल्याने तोंडाने न बोलता लेखणीतून मुंढे यांच्यासारखेच कठोर निर्णय घेतात असा महापालिकेतील बहुतांशी अनुभव!एका आयएसएस अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय फिरवता येत नाही असे सांगून मुंढे यांचे अनेक निर्णय त्यांनी पुढेही सुरू ठेवले असले तरी अलिकडील काळात त्यांनी जे दोन धाडसी निर्णय घेतले किंवा विचार व्यक्त केले ते बघता मुंढे बरोबर की गमे असा प्रश्न निर्माण झाला तर गैर नाही.

ठळक मुद्देमुंढे यांचे निर्णय गमेंनी फिरवलेकाही निर्णय मात्र टाळल्याने संभ्रम

नाशिक- महापालिकेत ज्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली ते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले राधाकृष्ण गमे हे अत्यंत परिपक्व अधिकारी मानले जातात. महसुल सेवेचा अनुभव असल्याने तोंडाने न बोलता लेखणीतून मुंढे यांच्यासारखेच कठोर निर्णय घेतात असा महापालिकेतील बहुतांशी अनुभव!एका आयएसएस अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय फिरवता येत नाही असे सांगून मुंढे यांचे अनेक निर्णय त्यांनी पुढेही सुरू ठेवले असले तरी अलिकडील काळात त्यांनी जे दोन धाडसी निर्णय घेतले किंवा विचार व्यक्त केले ते बघता मुंढे बरोबर की गमे असा प्रश्न निर्माण झाला तर गैर नाही.

गमे यांच्या तुलनेत गमे यांचा अनुभव आणि सेवा दोन्हींचा अनुभव अधिक असल्याने त्यांच्या कार्यशैलीतील अनेक बाबी ढळकपणे अनुभवायला येतात. विशेषत: प्रशासन चालवताना आणि लोकप्रतिनिधींशी परखडपणे बोलून तडकाफडकी घेण्याचा मुंडे यांच्या प्रमाणे निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव नाही. सर्वाशी गोड बोलून बघतो, करतो माहिती घेतो आणि शासनाकडून मार्गदर्शन मागवतो असे सांगून ते सहज विषय बाजुला सारतात आणि त्यांना घ्यायचा तोच निर्णय घेऊन अंमलातही आणतात. ते गोड बोलतात किंबहूना ऐकून घेतात हा अनेकांना मोठा गुण वाटतो. सहाजिकच मुंढे याच्या काळातील करवाढीचा निर्णय जैसे थे ठेवल्यानंतर देखील नगरसेवक आणि अन्य व्यक्तींचा रोष दिसून आला नाही.

शेतीवरील कर कमी न करता याविषयी मतभिन्नता असल्याने शासन म्हणजेच थर्ड अंपायरकडे पाठवून त्यांनी विषय बाजुला ठेवला आणि अन्य कर आकरणी सुरूच ठेवली. सामासिक अंतरावरील कर आकरणी रद्द केली तरी सोसायट्यांमधील वाहनतळावरील कर कायमच आहे. मात्र, त्यावर खदखद होत नाहीये हे विशेष. मुंढे यांनी रद्द केलेली अनेक कामे गमे यांनी कायम ठेवली. आणि नवा गडी नवा राज सुरू केला. परंतु त्यावर देखील टीका कोणी केलेली नाही.

प्रश्न आता निर्माण झाला आहे तो दोन निर्णयांचा. त्यातील पहिला निर्णय म्हणजे तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या १३६ आंगणवाड्या बंद केल्या होत्या आणि नगरसेवक तसेच आंगणवाडी सेविकांनी आंदोलने करून तसेच महासभेत दोन तीन वेळा ठराव करूनही मुंढे बधले नव्हते. महापालिकेने पटसंख्येबाबत तयार केलेले नियम आणि मुलांचे हित या दोन गोष्टींवर त्यांनी भर दिला होता तर नगरसेवक हे आंगणवाडी सेविकांच्या रोजगारासाठी त्या सुरू ठेवाव्या असा आग्रह धरीत असल्याचा मुंढे यांचा दावा होता. मुंढे यांनी फेर सर्वेक्षण करून आंगणवाडी सेविकांना पुन्हा एकवार पटसंख्या वाढविण्यासाठी संधी देण्याच्या विरोधात होते. मात्र, गमे यांनी मात्र आंगणवाड्यांच सर्वेक्षण करून १३६ पैकी ६२ आंगणवाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका वर्षानुवर्षे काम करतात आणि त्यामुळे त्यांना एकाएकी घरी बसवणे योग्य नाही ही कदाचित त्यांची भूमिका मानवतवादी असेलही मग, कायद्यात नसेल तर काय. मग मुंढे यांची भूमिकाच चुकीची होती काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दुसरा निर्णय थोडा संवेदनशील आणि भावनिक विषय होता. तो म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागताचा. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळ पालखीचे स्वागत करण्याची परंपरा होती. परंतु उच्च न्यायालयाने एका याचिकेत याबाबत धार्मिक सोहळ्यास महापालिकेचा खर्च करण्यास निर्बंध घातले आणि त्या आधारे शासनाने पत्रक काढले त्याचा आधार घेऊन मुंढे यांनी धार्मिक सोहळ्यासाठी खर्च नाही केवळ मुलभूत सुविधा देऊ असे स्पष्ट केल्यानंतर मुंढे हे नास्तिक आहेत, वैगैेरे टीका झाली. आणि पालखीचे स्वागत स्थळही बदलले. मुंढे यांनी कुंभमेळ्यात ज्या प्रमाणे धार्मिक विधीत हस्तक्षेप न करता केवळ भाविक येणार म्हणून मुलभूत सेवा देण्याचे कर्तव्य पार पाडते. त्याच धर्तीवर येथेही केवळ पाणी वैगरे सुविधा दिल्या. परंतु वारकऱ्यांना टाळ मृदूंग देण्याच्या नावाखाली जे घोटाळे झाले ते बघता अशाप्रकारे भेटी देणार नाही असे त्यांनी सांगितले होते आणि पालखी स्वागत समितीने देखील घोटाळे बघितल्यानंतर मुंढे यांची भूमिका योग्य ठरवली होती. मात्र गमे यांनी आता यंदा विलंब झाला पुढिल वर्षांपासून जंगी स्वागताची तरतूद करू असे सांगितले.

कोट्यवधी रूपयांच्या खर्चाचा अपव्यय किंवा करणाºया महापालिकेचा निधी पालखी सोहळ्यासाठी केला तर गैर नाही, किंंबहुना पालखीचे स्वागत नाशिक पंचायत समितीत होणे ही बाब नामुष्कीला कारक आहे परंतु तरीही मग गमे यांनी याबाबत नक्की काय मनात घेतले हे मात्र कळले नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे