शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

क्षय रोगाचा आजार कोरोना ,स्वाइन फ्ल्यू इतकाच घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 13:58 IST

२४ मार्च हा जागतिक क्षयरोग (टिबी) जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे भारताचे उद्दिष्ट कोरोनामुळे अवघड वाटत आहे.यावर्षीची क्षयरोग दिनाची संकल्पना काळ धावत आहे, अशी आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी वेळ कमी पडत आहे. यासाठी पुन्हा सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे .कारण कोरोनाचे मोठे आव्हान समोर उभे आहे.

ठळक मुद्देक्षय रोग जागृती दिन कोरोना सारखीच लक्षणेकाळजी घेण्याची गरज

२४ मार्च हा जागतिक क्षयरोग (टिबी) जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे भारताचे उद्दिष्ट कोरोनामुळे अवघड वाटत आहे.यावर्षीची क्षयरोग दिनाची संकल्पना काळ धावत आहे, अशी आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी वेळ कमी पडत आहे. यासाठी पुन्हा सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे .कारण कोरोनाचे मोठे आव्हान समोर उभे आहे.

२०२० मध्ये लॉक डाउनमुळे आणि कोरोनाची साथ वाढल्यामुळे क्षयरोगात काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी तसेच क्षयरोग निदानासाठी लागणारी मशिनरी हे सर्व कोरोनाकडे वळवले गेले. क्षयरोगाचे रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडू शकले नाही. यामुळे मागच्या वर्षी या आजाराचे फक्त पंचवीस टक्के रुग्ण सापडले. ७५ टक्के रुग्णांचे निदान होऊ शकले नाही आणि या रुग्णांनी क्षय रोगाचा आजार पसरवला असण्याची शक्यता आहे.

  क्षय रोगाचा आजार कोरोना ,स्वाइन फ्ल्यूसारखाच घातक आहे .कोरोना ,स्वाइन फ्ल्यू मध्ये आजार लवकर पसरतो आणि माणसाचा मृत्यू लवकर होऊ शकतो याच कारणास्तव या आजाराचा धसका घेतला जातो, परंतु क्षय रोगाचा आजार हा हळूहळू रुग्णाला नष्ट करतो. जगामध्ये आत्तापर्यंत १२३ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली व २.७ दशलक्ष लोकांचा मृत्यु झाला आहे. गेल्या २०१९ मध्ये १० दशलक्ष लोकांना क्षय रोगाची लागण झाली व १.४ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. भारतामध्ये ११.६ दशलक्ष लोकांना कोरोना संसर्ग झाला तर २४ लाख लोकांना क्षयरेागाची लागण झाली. भारतातील टीबी रुग्णांची संख्या अजून जास्त असू शकते कारण ३० ते ४० टक्के लोकांचे निदान होत नाही. भारतामध्ये १५ ते ४५ या वयोगटातील लोकांना जास्त प्रमाणात क्षयरेाग झालेला आढळतो. मात्र जे रुग्ण नियमित औषधे सेवन करतात त्यांचा आजार पूर्णपणे बरा होतो .गेल्या काही वर्षात क्षय रोगाच्या आजारामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मार्च २०२० च्या लॉकडाऊन नंतर तीन ते चार महिने क्षय रोग झालेल्या रुग्णांना रोग्य सुविधा मिळाल्या नाहीत. क्षयरोगाचे संशयित रुग्ण किंवा  उपचार सुरू असलेले रुग्ण घराबाहेर पडू शकले नाहीत, त्यामुळे क्षयरोगाच्या निदानाला तसेच उपचाराला उशीर झाला.

               आपल्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यचे म्हंटले जात आहे . त्यामुळे परत क्षय रोगाचे निदान आणि उपचार याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि असे झाले तर पुढील दोन वर्षात क्षय रोग झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढून जास्त लोकांचा या आजारामुळे मृत्यू होऊ शकतो.

आपल्याकडे बहुतांश लोक हे दाट वस्ती आणि छोट्या घरांमध्ये राहतात. कोरोनामुळे अशा वस्तीतील लोकांचा रोजगारावर परिणाम झाला. त्यात कुपोषण, दारिद्रयाची भर पडली .या सगळ्याचा परिणाम क्षय रोगाचे रुग्ण वाढण्यावर होण्याची शक्यता आहे किंवा टीबीचे निदान न झालेले रुग्ण आजार पसरवू शकतात. क्षय आणि कोरोनाची लक्षणे सारखी आहेत. कोरोना त्रास सुरू झाल्यापासून सात दिवसात खूप तीव्रतेने वाढतो याच्याविरुद्ध टीबीचा आजार त्रास सुरु झाल्यापासून हळूहळू वाढतो म्हणून एखाद्या रुग्णाला जर ताप खोकला ही लक्षणे असतील तर कोरोना आहे का क्षय याचे निदान व त्यानुसार उपचार होणे गरजेचे आहे.

      क्षय रोग आणि कोरोना हे दोन्ही आजार संसर्गजन्य आहेत. हवेतून त्याचा संसर्ग होतो. म्हणून दोन्ही आजारापासून बचावासाठी खोकताना शिंकताना तोंडावर आपला दंड ठेवावा. तसेच एकमेकांपासून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे व मास्क वापरावे, गर्दीत जाणे टाळावे, रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती घेणे. घरी ,कामाच्या ठिकाणी मोकळी, हवेशीर जागा असावी. साबण पाण्याने वीस सेकंद हात स्वच्छ धुवावेत, अशी दक्षता घेतल्यास क्षय रोगावर आजार चटकन बरा हाेईल.

- डॉ गौरी आचार्य- कुलकर्णी, क्षयरोग , फुफ्फुस विकार तज्ञ

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यWorld Tuberculosis Dayजागतिक क्षयरोग दिन