शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:28 IST

युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते. एकप्रकारे परमेश्वराच्या भेटीची आतुरता वारीत असते.

अण्णासाहेब मोरेयुगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते. एकप्रकारे परमेश्वराच्या भेटीची आतुरता वारीत असते. अहिंसा, सत्य, पावित्र्य, इंद्रियनिग्रह, मनसंयम, नैतिकता, निर्मलता, मानवता उत्तम आचरणातून, मनोधारणेतून सर्व कल्याणाची भावना बळकट होते. अशाच प्रकारची भावना वारीत दिसून येते. जेथे सर्वकल्याणाची भावना आहे तेथे समानता, एकता आहे हेच खरे वारीचे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म होय. अध्यात्म हे मानव जीवन व मानवी मनाच्या गरजेतून जिज्ञासेतून उदयास आले आहे. मानवाच्या संशोधन बुद्धीने विकसित केलेले साधना क्षेत्र किंवा साधना मार्ग यातून धर्म आणि तत्त्वज्ञान तयार झाले, असे म्हणता येईल. धर्म हे अध्यात्माचे व्यवहार्य आणि आचरणीय रूप आहे. भारतीय संस्कृतीत अनेक धर्म-पंथांचा उदय झाला. त्यात भागवत धर्म किंवा वारकरी सांप्रदाय हा सर्वसमावेशक मानला जातो. कारण त्याला सर्व जातीचे, धर्माचे लोक मानतात. वारी करणारा तो वारकरी होय. वारीमध्ये नियमितता असते. एकप्रकारे व्रत असते, जणूकाही वारी करणे हा वारकऱ्यांचा धर्मच आहे. माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी धारण केलेले उत्तम आचारविचार, विधिनिषेध स्वत:मधल्या व सृष्टीत सामावलेल्या चैतन्याचा स्वानुभूतीने घेतलेला वेध होय. मानवाने त्यासाठी तयार केलेली प्रणाली व त्याचे नियम या सर्वांचा समन्वय म्हणजे धर्म होय. वारीमध्ये आपल्याला नियमही दिसतात आणि समन्वयदेखील दिसतो. धर्म आणि तत्त्वज्ञानाचा संगम म्हणजे अध्यात्म होय. या अध्यात्माचा शोध घेणाºया आणि त्याचा खरा धर्म समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे वारी आहे. आत्म्याशी संवाद साधत आत्मविद्या आत्मसात करत करत ‘मी’पणा विसरण्याचा प्रयत्न म्हणजे वारी होय. वारी म्हणजे पराकोटीची श्रद्धा, भक्ती आणि ईश्वरी शक्तीची तेवढीच पराकोटीची ओढ आहे. दरवर्षी आषाढीची वारी निघते त्यात वारकरी नित्यनेमाने सहभागी होतात. या वारकºयांच्या सेवेसाठी हजारो हात पुढे येतात. हे सेवेकरीदेखील वारकरीच होय. वारीमध्ये वाटचाल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक संकटे येतात. जसे ऊन, वारा, पाऊस तसेच अपघात आणि आजारपण अशा घटना घडतात; परंतु या दु:खाची कोणाला पर्वा नसते. दु:खाच्या समस्त संवेदनांना अनुभवताना दु:खरहित शाश्वत मानसिकता मिळविण्याचा मार्ग किंवा साधना म्हणजेच वारी असते. त्या पंढरीरायाच्या ओढीमागे भौतिक, आध्यात्मिक अशी कारणे आहेत. समस्त भौतिक दु:खदायी व्यापात राहूनही मन:शांती बरोबरच शरीरालाही प्रफुल्लित करणारी ही वारी म्हणजे अध्यात्म आणि आत्मदर्शनाचे प्रवेशद्वारच म्हणायला हवे. एकप्रकारे नराला नारायण बनविण्यासाठी केलेली ही भावयात्रा आहे. एक अध्यात्म विचारांचा हा प्रकार आहे. रोजच्या भौतिकव्यापाला तोंड देण्यासाठी हवी असणारी सकारात्मकता विश्वास वाढविणारी ही यात्रा आहे. माणसाची तृप्ती कधीही मर्यादित गोष्टींनी होत नसते. वास्तविक तृप्तीसाठी त्याला अनंत, अलौकिक अनुभवण्याचा ध्यास असतो. हा ध्यास त्याच्या माणुसपणाची निशाणी आहे. भागवत संप्रदायात सर्व कल्याणाची भावना आहे. समानता, एकता हेच खरे वारीचे तत्त्वज्ञान आणि खरे अध्यात्म आहे. आमच्या सर्व थोर संतांनी डोळस श्रद्धा शिकविली आहे. अमानवीयता, निरर्थक, कर्मकांड, पाखंड, देखावा, संकुचितपणा या विरोधात संतांनी आयुष्यभर लढा दिला. म्हणूनच वारीत सर्वकल्याण सर्वात्मकता, एकता आपसूकच दिसून येते. हजारो वारकरी आणि लाखो भाविकांनी विठुरायाला घातलेले पावसाचे साकडे निश्चित पूर्ण होते.(लेखक दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राचे प्रमुख आहेत.)

 

 

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम