शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
7
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
8
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
9
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
10
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
11
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
12
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
14
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
15
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
16
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
17
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
18
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
19
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
20
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्माचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:28 IST

युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते. एकप्रकारे परमेश्वराच्या भेटीची आतुरता वारीत असते.

अण्णासाहेब मोरेयुगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते. एकप्रकारे परमेश्वराच्या भेटीची आतुरता वारीत असते. अहिंसा, सत्य, पावित्र्य, इंद्रियनिग्रह, मनसंयम, नैतिकता, निर्मलता, मानवता उत्तम आचरणातून, मनोधारणेतून सर्व कल्याणाची भावना बळकट होते. अशाच प्रकारची भावना वारीत दिसून येते. जेथे सर्वकल्याणाची भावना आहे तेथे समानता, एकता आहे हेच खरे वारीचे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म होय. अध्यात्म हे मानव जीवन व मानवी मनाच्या गरजेतून जिज्ञासेतून उदयास आले आहे. मानवाच्या संशोधन बुद्धीने विकसित केलेले साधना क्षेत्र किंवा साधना मार्ग यातून धर्म आणि तत्त्वज्ञान तयार झाले, असे म्हणता येईल. धर्म हे अध्यात्माचे व्यवहार्य आणि आचरणीय रूप आहे. भारतीय संस्कृतीत अनेक धर्म-पंथांचा उदय झाला. त्यात भागवत धर्म किंवा वारकरी सांप्रदाय हा सर्वसमावेशक मानला जातो. कारण त्याला सर्व जातीचे, धर्माचे लोक मानतात. वारी करणारा तो वारकरी होय. वारीमध्ये नियमितता असते. एकप्रकारे व्रत असते, जणूकाही वारी करणे हा वारकऱ्यांचा धर्मच आहे. माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी धारण केलेले उत्तम आचारविचार, विधिनिषेध स्वत:मधल्या व सृष्टीत सामावलेल्या चैतन्याचा स्वानुभूतीने घेतलेला वेध होय. मानवाने त्यासाठी तयार केलेली प्रणाली व त्याचे नियम या सर्वांचा समन्वय म्हणजे धर्म होय. वारीमध्ये आपल्याला नियमही दिसतात आणि समन्वयदेखील दिसतो. धर्म आणि तत्त्वज्ञानाचा संगम म्हणजे अध्यात्म होय. या अध्यात्माचा शोध घेणाºया आणि त्याचा खरा धर्म समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे वारी आहे. आत्म्याशी संवाद साधत आत्मविद्या आत्मसात करत करत ‘मी’पणा विसरण्याचा प्रयत्न म्हणजे वारी होय. वारी म्हणजे पराकोटीची श्रद्धा, भक्ती आणि ईश्वरी शक्तीची तेवढीच पराकोटीची ओढ आहे. दरवर्षी आषाढीची वारी निघते त्यात वारकरी नित्यनेमाने सहभागी होतात. या वारकºयांच्या सेवेसाठी हजारो हात पुढे येतात. हे सेवेकरीदेखील वारकरीच होय. वारीमध्ये वाटचाल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक संकटे येतात. जसे ऊन, वारा, पाऊस तसेच अपघात आणि आजारपण अशा घटना घडतात; परंतु या दु:खाची कोणाला पर्वा नसते. दु:खाच्या समस्त संवेदनांना अनुभवताना दु:खरहित शाश्वत मानसिकता मिळविण्याचा मार्ग किंवा साधना म्हणजेच वारी असते. त्या पंढरीरायाच्या ओढीमागे भौतिक, आध्यात्मिक अशी कारणे आहेत. समस्त भौतिक दु:खदायी व्यापात राहूनही मन:शांती बरोबरच शरीरालाही प्रफुल्लित करणारी ही वारी म्हणजे अध्यात्म आणि आत्मदर्शनाचे प्रवेशद्वारच म्हणायला हवे. एकप्रकारे नराला नारायण बनविण्यासाठी केलेली ही भावयात्रा आहे. एक अध्यात्म विचारांचा हा प्रकार आहे. रोजच्या भौतिकव्यापाला तोंड देण्यासाठी हवी असणारी सकारात्मकता विश्वास वाढविणारी ही यात्रा आहे. माणसाची तृप्ती कधीही मर्यादित गोष्टींनी होत नसते. वास्तविक तृप्तीसाठी त्याला अनंत, अलौकिक अनुभवण्याचा ध्यास असतो. हा ध्यास त्याच्या माणुसपणाची निशाणी आहे. भागवत संप्रदायात सर्व कल्याणाची भावना आहे. समानता, एकता हेच खरे वारीचे तत्त्वज्ञान आणि खरे अध्यात्म आहे. आमच्या सर्व थोर संतांनी डोळस श्रद्धा शिकविली आहे. अमानवीयता, निरर्थक, कर्मकांड, पाखंड, देखावा, संकुचितपणा या विरोधात संतांनी आयुष्यभर लढा दिला. म्हणूनच वारीत सर्वकल्याण सर्वात्मकता, एकता आपसूकच दिसून येते. हजारो वारकरी आणि लाखो भाविकांनी विठुरायाला घातलेले पावसाचे साकडे निश्चित पूर्ण होते.(लेखक दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राचे प्रमुख आहेत.)

 

 

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम