शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात टंचाई : टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा; पाण्यासाठी महिलांची भटकंतीआराखड्यात विंधनविहिरींवर भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:28 PM

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही.

ठळक मुद्देएकदा निवडून गेले की आश्वासनांचा विसर टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही. नेतेमंडळी, आमदार, खासदार दर पाच वर्षांनी टँकरमुक्त तालुका करण्याची आश्वासने देतात; पण हे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नाही आणि हीच मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करू, तालुका टंचाईमुक्त करू अशी आश्वासने दर निवडणुकीत दिली जातात; मात्र एकदा निवडून गेले की त्यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. निर्मला गावित गेल्या दहा वर्षांपासून या तालुक्याचे नेतृत्व करतात. महिला आमदार असल्याने त्यांना महिलांच्या समस्यांची जाणीव आहे. महिला वर्गाला पाण्याचा किती त्रास होत असतो याचीही जाणीव आहे. पण दहा वर्षांत त्यांना पाण्याची समस्या सोडविता आलेली नाही. अर्थात तालुका पूर्णत: टँकरमुक्त झाला नसला तरी टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी झाली आहे. तथापि, दरवर्षी मार्चपासूनच तालुक्यात लोकांना टंचाई स्थितीशी सामना करण्याची वेळ येते आणि उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचे प्रारब्ध चुकता चुकत नाही. आता यावर्षी मात्र विंधनविहिरींवर भर देण्यात आला आहे. विंधनविहिरींनाच विद्युत कनेक्शनद्वारे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून गावाला पाणीपुरवठा करावयाचा आहे. आणि योजना नाहीच यशस्वी झाली तर शेवटी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा पर्याय आहेच. तालुक्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाई भासते. आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा. जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा व एप्रिल ते जून तिसरा टप्पा अशाप्रकारे नियोजन केले आहे. आराखडा आॅक्टोबरमध्ये केल्यावर टंचाई नियोजनात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मलाताई गावित, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वनमने यांच्या स्वाक्षरीने टंचाई नियोजन आराखडा तयार केला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहसा टंचाई स्थिती निर्माण होत नाही. यावर्षी सन २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला होता. त्यामुळे टंचाई स्थिती अद्यापपावेतो सुरू झालेली नाही. दि. १९ रोजी सोमनाथनगर येथील पहिलाच प्रस्ताव दाखल झाला आहे. यावर्षी तिसºया टप्प्यात ज्यांना टंचाईची झळ पोहोचेल अशा ८५ गावांचा व १८३ वाड्या-पाड्यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे व त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. या नियोजनात ५५ गावांना व १०९ वाड्या-पाड्यांना नव्याने विंधनविहिरी घेणे प्रस्तावित आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण ३० गावे व ७० वाड्यांना व १०४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे तिसºया टप्प्यात एकूण ८५ गावे व १८३ वाड्या मिळून २६८ गावांचे टंचाई नियोजन करण्यात आले आहे.