शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरचा कचरा डेपो झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 23:04 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.

ठळक मुद्देतळवाडेच्या शेतकऱ्याने नेला स्वखर्चाने वाहून

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.

दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी नुकतीच खत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्र्यंबक नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी अक्षरशः भरलेला होता. चिंध्या, कपडे जमिनीत गाडले गेले तर त्याचे उत्तम खत निर्माण होते. नेमकी ही बाब तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी हेरली आणि सर्व चिंध्या व तयार होत असलेला खतवजा कचरा ट्रकमध्ये भरून नेत स्वत:च्या शेतावर नेला. त्यामुळे कचरा डेपो मोकळा झाला.

पालिकेला असा कचरा नेणारा व डेपो मोकळा करून देणारा शेतकरी हवाच होता. त्यासाठी विनामोबदला हा कचरा देण्याची तयारी नगर परिषदेने दर्शवली होती. तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके पालिकेला योगायोगाने भेटले आणि संपूर्ण कचरा त्यांनी स्वखर्चाने वाहून नेला. तीन दिवसात कंपोस्ट खत प्रकल्प वगळता डेपो मोकळा करण्यात आला.इन्फोपालिकेच्या गंगाजळीत भरत्र्यंबकला दररोज १० ते १५ ट्रॅक्टर ओला व सुका कचरा घंटागाडीद्वारे कचरा डेपोत वाहून आणला जातो. तसेच गावातील हॉटेल्स, खाणावळमधील शिळे, उष्टे अन्न टेम्पोत भरून तळवाडे येथील बायोगॅस प्रकल्पावर पाठविले जाते. गावातील लोकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत स्वीकारला जातो. कचरा डेपोत चिंध्यांचे गठ्ठे बांधले जातात. प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिक वितळविण्याच्या कंपनीत पाठविले जातात. चिंध्या खड्ड्यात टाकून बुजवल्या की त्याच्या पासून खत तयार होते. देवस्थानच्या निर्माल्यापासूनही सेंद्रिय खत तयार होते. हेच सेंद्रिय खत विकून पालिकेच्या गंगाजळीत अल्पशी का होईना भर पडत असते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरgram panchayatग्राम पंचायत