शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

त्र्यंबकेश्वरचा कचरा डेपो झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 23:04 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.

ठळक मुद्देतळवाडेच्या शेतकऱ्याने नेला स्वखर्चाने वाहून

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.

दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी नुकतीच खत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्र्यंबक नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी अक्षरशः भरलेला होता. चिंध्या, कपडे जमिनीत गाडले गेले तर त्याचे उत्तम खत निर्माण होते. नेमकी ही बाब तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी हेरली आणि सर्व चिंध्या व तयार होत असलेला खतवजा कचरा ट्रकमध्ये भरून नेत स्वत:च्या शेतावर नेला. त्यामुळे कचरा डेपो मोकळा झाला.

पालिकेला असा कचरा नेणारा व डेपो मोकळा करून देणारा शेतकरी हवाच होता. त्यासाठी विनामोबदला हा कचरा देण्याची तयारी नगर परिषदेने दर्शवली होती. तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके पालिकेला योगायोगाने भेटले आणि संपूर्ण कचरा त्यांनी स्वखर्चाने वाहून नेला. तीन दिवसात कंपोस्ट खत प्रकल्प वगळता डेपो मोकळा करण्यात आला.इन्फोपालिकेच्या गंगाजळीत भरत्र्यंबकला दररोज १० ते १५ ट्रॅक्टर ओला व सुका कचरा घंटागाडीद्वारे कचरा डेपोत वाहून आणला जातो. तसेच गावातील हॉटेल्स, खाणावळमधील शिळे, उष्टे अन्न टेम्पोत भरून तळवाडे येथील बायोगॅस प्रकल्पावर पाठविले जाते. गावातील लोकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत स्वीकारला जातो. कचरा डेपोत चिंध्यांचे गठ्ठे बांधले जातात. प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिक वितळविण्याच्या कंपनीत पाठविले जातात. चिंध्या खड्ड्यात टाकून बुजवल्या की त्याच्या पासून खत तयार होते. देवस्थानच्या निर्माल्यापासूनही सेंद्रिय खत तयार होते. हेच सेंद्रिय खत विकून पालिकेच्या गंगाजळीत अल्पशी का होईना भर पडत असते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरgram panchayatग्राम पंचायत