शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१' फक्त फलकांवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 17:56 IST

त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देगावात अनेक ठिकाणी कुठेही कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसतात.

त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे.गावातील सफाईचा ठेका एका खासगी कंपनीला दिला आहे. त्या कंपनीमार्फत गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, गटारी, रस्ते साफसफाई, मृत प्राणी, जनावरे उचलणे, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकची विल्हेवाट आदी कामे केली जातात, पण यापैकी कोणतीच कामे धड केली जात नाहीत. घंटागाडी येण्याची निश्चित वेळ नाही. आली तरी ओला कचरा, सुका कचरा महिलांच्या हातून घंटागाडीत टाकला जातो व निम्मा कचरा रस्त्यावरच सांडला जातो. कचरा संकलन झाल्यावर घंटागाडी निघून गेली, की रस्त्यावर सांडलेला कचरा तसाच पडून इतरत्र पसरतो.थोडक्यात, घंटागाडी येऊन गेल्यावर त्या भागात रस्त्यावर घाण पसरली जाते, असे चित्र पाहायला मिळते. मात्र, पालिकेकडून बिले वेळेवर वसूल केले जातात. प्रत्यक्षात दररोज किती गटारी, स्वच्छतागृह स्वच्छ केले जातात व किती मृत जनावरे उचलले जातात याबाबतची निश्चित माहिती स्वच्छतेचा अधिभार सोपविलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील माहीत नाही. पालिकेतील स्वच्छता निरीक्षक पी. बी. बडगुजर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची स्वच्छता निरीक्षकाची जागा अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे स्वच्छता ठेकेदाराच्या विश्वासावरच गावातली स्वच्छता वाऱ्यावर आहे.दर महिन्याला ठेकेदाराला लाखो रुपयाचे बिल मिळूनही खरे सफाई कामगार पुरेशा वेतनाअभावी वंचितच राहतात. ऊन, वारा व पावसात काम करणाऱ्या ठेका कर्मचाऱ्यांना अल्प मोबदला दिला जातो. त्यातही वेळेवर पगार दिला जात नसल्याने काही वेळेला कामबंद आंदोलन करण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर येत असते.मेनरोड परिसरातील एक महिला पदाधिकारी (पाणीपुरवठा सभापती) शीतल उगले यांनी स्वतः त्यांच्या प्रभागापुरती घंटागाडी, त्यावरील चालक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह स्वतंत्रपणे सफाई, कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. गावात लोक राजरोसपणे घंटागाडी येत असताना कुठेही कचरा फेकतात. शिळे अन्न, खरकटे पाणी ओहळात फेकले जाते. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी कुठेही कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसता, त्याकडे स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यTransferबदली