शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

त्र्यंबकेश्वरला 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१' फक्त फलकांवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 17:56 IST

त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देगावात अनेक ठिकाणी कुठेही कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसतात.

त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे.गावातील सफाईचा ठेका एका खासगी कंपनीला दिला आहे. त्या कंपनीमार्फत गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, गटारी, रस्ते साफसफाई, मृत प्राणी, जनावरे उचलणे, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकची विल्हेवाट आदी कामे केली जातात, पण यापैकी कोणतीच कामे धड केली जात नाहीत. घंटागाडी येण्याची निश्चित वेळ नाही. आली तरी ओला कचरा, सुका कचरा महिलांच्या हातून घंटागाडीत टाकला जातो व निम्मा कचरा रस्त्यावरच सांडला जातो. कचरा संकलन झाल्यावर घंटागाडी निघून गेली, की रस्त्यावर सांडलेला कचरा तसाच पडून इतरत्र पसरतो.थोडक्यात, घंटागाडी येऊन गेल्यावर त्या भागात रस्त्यावर घाण पसरली जाते, असे चित्र पाहायला मिळते. मात्र, पालिकेकडून बिले वेळेवर वसूल केले जातात. प्रत्यक्षात दररोज किती गटारी, स्वच्छतागृह स्वच्छ केले जातात व किती मृत जनावरे उचलले जातात याबाबतची निश्चित माहिती स्वच्छतेचा अधिभार सोपविलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील माहीत नाही. पालिकेतील स्वच्छता निरीक्षक पी. बी. बडगुजर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची स्वच्छता निरीक्षकाची जागा अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे स्वच्छता ठेकेदाराच्या विश्वासावरच गावातली स्वच्छता वाऱ्यावर आहे.दर महिन्याला ठेकेदाराला लाखो रुपयाचे बिल मिळूनही खरे सफाई कामगार पुरेशा वेतनाअभावी वंचितच राहतात. ऊन, वारा व पावसात काम करणाऱ्या ठेका कर्मचाऱ्यांना अल्प मोबदला दिला जातो. त्यातही वेळेवर पगार दिला जात नसल्याने काही वेळेला कामबंद आंदोलन करण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर येत असते.मेनरोड परिसरातील एक महिला पदाधिकारी (पाणीपुरवठा सभापती) शीतल उगले यांनी स्वतः त्यांच्या प्रभागापुरती घंटागाडी, त्यावरील चालक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह स्वतंत्रपणे सफाई, कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. गावात लोक राजरोसपणे घंटागाडी येत असताना कुठेही कचरा फेकतात. शिळे अन्न, खरकटे पाणी ओहळात फेकले जाते. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी कुठेही कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसता, त्याकडे स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यTransferबदली