शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाशिक विधान परिषदेत रंगणार तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:41 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत सहाणे, दराडे, कोकणी यांच्यात रंगणार चुरस कोकणी यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परवेझ कोकणी यांच्यावर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु कोकणी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला अर्ज काम ठेवल्याने पक्षीय बलाबल व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमिवर राष्ट्रवादीचे अ‍ॅड.शिवाजी सहाणे शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेझ कोकणी यांच्यातच तिरंगी लढत बघायला मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अ‍ॅड. शिवाजी सहाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी अ‍ॅड. सहाणे शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक गट होता. परंतु पक्षाने त्यांना तिक ीट नाकारल्यामुळे हा गट नाराज असून शिवसेना भाजपने युती केल्यानंतरही त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे परवेझ कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे युतीची काही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अ‍ॅड. सहाणो यांना त्यांचे बेरजेचे राजकारण पाहून ऐणवेळी उमेदवारी जाहीर केली आहे. गत विधान परिषद निवडणुकीतही अ‍ॅड. सहाणे यांनी पक्षीय बलाबल तुलनेत कमी असताना आमदार जयंत जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती. या पाश्र्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असतानाही कोकणी यांचा अर्ज कायम राहिल्याने या लढतीत चूरस निर्माण झाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस