शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नाशिक विधान परिषदेत रंगणार तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:41 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत सहाणे, दराडे, कोकणी यांच्यात रंगणार चुरस कोकणी यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परवेझ कोकणी यांच्यावर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु कोकणी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला अर्ज काम ठेवल्याने पक्षीय बलाबल व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमिवर राष्ट्रवादीचे अ‍ॅड.शिवाजी सहाणे शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेझ कोकणी यांच्यातच तिरंगी लढत बघायला मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अ‍ॅड. शिवाजी सहाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी अ‍ॅड. सहाणे शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक गट होता. परंतु पक्षाने त्यांना तिक ीट नाकारल्यामुळे हा गट नाराज असून शिवसेना भाजपने युती केल्यानंतरही त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे परवेझ कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे युतीची काही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अ‍ॅड. सहाणो यांना त्यांचे बेरजेचे राजकारण पाहून ऐणवेळी उमेदवारी जाहीर केली आहे. गत विधान परिषद निवडणुकीतही अ‍ॅड. सहाणे यांनी पक्षीय बलाबल तुलनेत कमी असताना आमदार जयंत जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती. या पाश्र्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असतानाही कोकणी यांचा अर्ज कायम राहिल्याने या लढतीत चूरस निर्माण झाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस