त्र्यंबक तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर खरीप लागवड होणार; पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
By Admin | Updated: June 1, 2014 01:09 IST2014-05-31T19:12:47+5:302014-06-01T01:09:22+5:30
त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षेत्र ३३५२४ आहे. वनक्षेत्र ३३६६७ हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आज खरीप क्षेत्र २६,४०० हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र फक्त ७०० हेक्टर असून, बागायती क्षेत्र ३३४ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात, नागली ही मुख्य पिके असून, त्यांच्या जोडीला उडीद खुरसणी, भुईमूग आदि पिके घेतली जातात. घोटीबरोबरच त्र्यंबकचा तांदूळदेखील प्रसिद्ध आहे. भात व नागलीच्या रोपांसाठी जमीन भाजणी, राख गोळा करून रोपांची जेवढी जागा हवी असेल तेवढ्या जागेत राख-गोवर्या पसरणे व त्यास आग लावून जमीन भाजणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे धूर दिसत आहे. त्यानंतर पाऊ

त्र्यंबक तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर खरीप लागवड होणार; पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
त्र्यंबकेश्वर- पावसाचे ठिकाण व आदिवासी बहुल म्हणून प्रसिद्ध असणार्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी २४,४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ (भौगोलिक) ८९५८२ हेक्टर असून, वहिती लायक क्षेत्र ३३५२४ आहे. वनक्षेत्र ३३६६७ हेक्टर क्षेत्र असून, तालुक्यात आज खरीप क्षेत्र २६,४०० हेक्टर आहे. रब्बी क्षेत्र फक्त ७०० हेक्टर असून, बागायती क्षेत्र ३३४ हेक्टर इतके आहे. तालुक्यात भात, नागली ही मुख्य पिके असून, त्यांच्या जोडीला उडीद खुरसणी, भुईमूग आदि पिके घेतली जातात. घोटीबरोबरच त्र्यंबकचा तांदूळदेखील प्रसिद्ध आहे. भात व नागलीच्या रोपांसाठी जमीन भाजणी, राख गोळा करून रोपांची जेवढी जागा हवी असेल तेवढ्या जागेत राख-गोवर्या पसरणे व त्यास आग लावून जमीन भाजणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे धूर दिसत आहे. त्यानंतर पाऊस पडल्यास लगेच पेरणी केली जाईल. तत्पूर्वी जागा नांगरून दिली जात आहे. तालुक्यातील खरीप उत्पन्न निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. निसर्गचक्रही साधारणत: एक महिना पुढे वाढले असून, आता तर केव्हाही निसर्गाचे वातावरण बदलत असून, अवकाळी पाऊस, कधी थंडी आदि बदल होत असतात. याचा परिणाम अवकाळी पाऊस पडणे किंवा वेळेवर पाऊस न पडणे, कडकडीत ऊन पडणे अशा नैसर्गिक आपत्ती येत असल्याने पीक उत्पन्नावर परिणाम होणे असा प्रकार या परिसरात पाचवीच्या पुजलेला असतो. यातूनही या भागातील शेतकरी उभा राहिला आहे. तालुक्यात जवळपास १२९१ विहिरी असल्या तरी त्या प्रत्येक विहिरींना पाणी असतेच असे नाही. या पार्श्वभूमीवर जवाहर विहिरी आता ही योजना रोजगार हमी योजनेखाली आणण्यात आली आहे.