शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

बागलाण तालुक्यातील आदिवासींना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:46 IST

बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्याकडे तक्र ार करून एक महिना उलटला तरीदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने यंत्रणा संशयाच्या भोवºयात सापडली आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील पठावे दिगर गटातील मानूर येथील शंभरहून अधिक आदिवासींना घरकुल मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचाने हजारो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्याकडे तक्र ार करून एक महिना उलटला तरीदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने यंत्रणा संशयाच्या भोवºयात सापडली आहे.  शासनाने आदिवासी दुर्गम भागात राहणाºया आदिवासी बांधवांच्या निवाºयासाठी विविध योजनांमधून घरकुल बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र पुढारी आणि अधिकारी या जोडगोळीला टक्केवारीची कीड लागल्यामुळे अशा योजनांचा फज्जा उडून अजूनही एकवेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या हजारो गरीब आदिवासींना बेघर राहवे लागत आहे. असाच काहीसा प्रकार बागलाण तालुक्यातील मानूर येथील आदिवासी बांधवांना अनुभवयास मिळत आहे.याबाबत मानूरच्या बारा पाड्यातील शंभरहून अधिक आदिवासींनी थेट जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्याकडे एका निवेदनाद्वारे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला.मानूर येथील पंचायत समतिी सदस्य ,ग्रामसेवक ,सरपंच ,उपसरपंच हेहुकुमशाही पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहात असून अक्षरश: कागदोपत्रीच ग्रामसभा व मासिक सभा घेऊन मनमानी करून सोयीस्करपणे ठराव तयार केले जात असल्याचा गंभीर आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.उभय पुढार्यांची चौकडी पंतप्रधान आवास योजना ,शबरी घरकुल योजना आदी योजनांमधील मंजूर लाभार्थ्यांची यादी स्वत: जवळ ठेऊन घरकुल हव असेल तर साहेबांना पैसे द्यावे लागतील अन्यथा मंजूर होणार नसल्याचे सांगितले जाते.याप्रकाराबाबत संजय राजाराम गवळी ,रामदास गणसू गावित ,गंगाराम सोनजी गायकवाड ,धनाजी गावित ,काळू पवार ,कैलास गायकवाड ,किसन गांगुर्डे आदी ग्रामस्थांनी येथील गटविकास अधिकारी यांच्याना अनेक वेळा भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र न्याय मिळाला नाही म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मीना यांच्याकडे तक्र ार केली परंतु एक मिहना उलटूनही अद्याप दखल न घेतल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.घरकुलसाठी पैशांसोबत कोंबडाही....दिवसभर काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरणार्या आदिवासींच्या टाळूवरची लोणी खाणार्या पुढारी आण िअधिकार्यांनी भ्रष्टाचाराची सीमाच पार केली.पठावे दिगर गटातील पंचायत समतिी सदस्याने चक्क शिवाजी मन्साराम ठाकरे या मोलमजुरी करणार्या गरीब आदिवासीकडून घरकुल मंजूर करण्यासाठी चक्क रोख तीन हजार रु पयांबरोबरच दीड पावणेदोन किलोचा कोंबडा घेतल्याचे तक्र ारीत म्हटले आहे.या भ्रष्ट चौकडीने मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहून पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल हव असल्यास त्या लाभार्थ्याला बोलावून दोन हजार दिल्यास तत्काळ मंजूर करण्याचे आमिष दाखिवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ हवा असल्यास लाभार्थ्याच्या ऐपतीप्रमाणे दहा ते तीस हजार रु पयांपर्यंत पैसे घेऊन लुबाडल्याचे तक्र ारीत म्हटले आहे. 

टॅग्स :HomeघरNashikनाशिक