आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 5, 2015 22:32 IST2015-09-05T22:32:07+5:302015-09-05T22:32:44+5:30
कळवण तालुका : दुष्काळाने घेतला पहिला बळी

आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या
कळवण : सन २००८ पासून घेतलेल्या कर्जाच्या वाढत्या भारामुळे कळवण तालुक्यातील नाळीद येथील आदिवासी शेतकरी सीताराम लहानू जगताप यांनी शुक्र वारी दुपारी १२ ते१ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली़ ,वाढलेला कर्जबाजारीपणा ,खासगी सावकाराचे व हात उसनवार देणे , उदभवलेली दुष्काळी परिस्थिती यामुळे हवालिदल झालेल्या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने दुष्काळाने कळवण तालुक्यात पिहला बळी घेतला
नाळीद येथील आदिवासी शेतकरी सीताराम लहानू जगताप यांनी सन २००८ मध्ये देसराने येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते ,दरवर्षी फक्त उलटपालट केली जात होती त्यामुळे कर्जाच्या वाढत्या भारामुळे ते आर्थिक तणावात सध्या वावरत होते ,जगताप यांच्याकडे अडीच एकर शेतजमीन असून गावालगत व देसराने शिवारात आहे ,शेतात विहीर ,पाईपलाईन साठी सोसायटी कडून कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड होत नव्हती ,शिवाय खासगी सावकार व हात उसनंवार ५० हजार रु पये ,एक एकर जमीन गहाण ठेवून ५० हजार रु पये व देसराने सोसायटीचे ३ लाख रु पये असे जवळपास ४ लाख रु पयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होत़े कौटुंबिक अडचणीमुळे गेल्या काही दिवसांपासून सीताराम जगताप आर्थिक व मानिसक तणावाखाली वावरत असल्याचे ग्रामस्थ व नातेवाईक यांनी सांगितले ,
शुक्र वारी सकाळी जगताप यांनी घरातील सर्वाना गावाजवळील शेतात जायला सांगून घरी आराम करतो असे सांगितल्याने घरातील सर्व शेतात निघून गेले ,त्यामुळे घरात कुणी नसल्याचे लक्षात घेवून त्यांनी घरातच विषारी औषधप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवून त्यांनी कायमचा आराम केल्याचे त्यांचे पुत्र संजय व सुनील जगताप यांनी सांगितले, शुक्र वारी दुपारी हि घटना घडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जगताप यांना तत्काळ औषधोपचारासाठी कळवण उपजिल्हारु ग्णालयात दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले़ शवविच्छेदन करून सायंकाळी नाळीद येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ,कळवण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला ,आज सकाळी कळवणचे तहसीलदार अनिल पुरे ,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ सुरेखा जगताप ,कृषी विभागाचे आर एन निकम ,योगेश वाघ ,पोलिस निरीक्षक मधुकर गावित यांनी ग्रामस्थ व जगताप कुटुंबियांची भेट घेवून सात्वन करून त्यांना धीर
दिला , त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले व मुलगी असा परिवार आहे ़
(वार्ताहर)