शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

आदिवासी विकास महामंडळ उभारणार ‘ट्रायफूड’ केंद्र, केंद्रांना निधीचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:10 IST

कोरोना संकटाच्या काळात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने वनधन केंद्रांना सुमारे आठ कोटी रुपये निधीचे वाटप केल्याने या केंद्रांवर काम करणाऱ्या गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असून, लॉकडाऊनमध्येही त्यांना रोजगार मिळाला आहे.

नाशिक : कोरोना संकटाच्या काळात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने वनधन केंद्रांना सुमारे आठ कोटी रुपये निधीचे वाटप केल्याने या केंद्रांवर काम करणाऱ्या गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असून, लॉकडाऊनमध्येही त्यांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, राज्यभरातील आदिवासी गोळा करीत असलेले गौण वनउपज एकाच छताखाली मिळण्यासाठी महामंडळ ट्रायफूड केंद्र सुरू करणार आहे.केंद्र शासनाने आधारभूत किमतीवर गौण वनउपज खरेदी योजना सुरू केली असून, सन २०१४ पासून आदिवासी विकास महामंडळामार्फत गौण वनउपज खरेदी केली जाते. या योजनेला केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ट्रायफूडच्या माध्यमातून अर्थसाहाय्य दिले जात असून, यासाठी राज्यभरात वनधन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. अनुसूचित क्षेत्राखालील राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात असून, आतापर्यंत २६४ वनधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.पहिल्या टप्प्यात या योजनेसाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्या माध्यमातून वनधन केंद्रांना प्रशिक्षण देण्यात आले. या केंद्रातील सदस्य असलेल्या आदिवासींनी जंगलात फिरून गोळा केलेले गौण वनउपज खरेदी केले जाते. या केंद्रांना डिजिटायझेशनसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये निधी देण्यात येणार असून, त्यापैकी अर्धे पैसे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वनधन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी ट्रायफूडच्या सूचनांनुसार ६ कोटी ४८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामुळे वनधन केंद्रांवर काम करणाऱ्या  गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला आहे.वनधन केंद्रांचा वापरवनधन केंद्रांचे ट्रायफूड केंद्र सुरू करण्याचे आदिवासी विकास महामंडळाचे प्रयत्न असून, लॉकडाऊन उठल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. गडचिरोली येथे मोहफूल, नंदुरबार येथे आमचूर व मोहफूल, जव्हार येथे गुळवेल यांचे ट्रायफूड केंद्र तयार करण्याचे विचाराधीन असून त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र