शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीतर्फे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: December 16, 2015 23:01 IST

सटाणा : पाण्याच्या आवर्तनासाठी पुन्हा तारीख पे तारीख

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्याचे जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठवडयात नियोजन करण्यात आले.त्यानुसार १४ डिसेंबर रोजी हरणबारी धरणातून पिण्यासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे जाहीर केले होते.मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने घुमजाव करत पुन्हा तारीख पे तारीख चे गुऱ्हाळ चालू केले आहे.त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी बारा वाजेपासून तहसीलदारांच्या दालनात तब्बल साडे तास ठिय्या देऊन पाणी सोडण्याची मागणी केली.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी १७ डिसेंबरला पाणी सोडण्याबाबत आदेश काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.जिल्हा प्रशानाने पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत पुन्हा चालढकल सुरु केली. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी अचानक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पागर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिदारांच्या दालनात दुपारी बारा वाजेपासून हरणबारी धरणातून तत्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार हे नाशिक येथे बोलावलेल्या बैठकीला गेल्याने जबाबदार अधिकारी आल्याशिवाय ठिय्या मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. दरम्यान साडे तीन वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मोसम नदी पात्रालगतच्या गावातील पाणी टंचाई लक्षात घेता हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्याचे पिहले आवर्तन सोडण्याबत गुरु वार दि.१७ सायंकाळी पाच वाजता आदेश काढण्याबाबत आश्वासन दिले .त्यानंतर साडे तीन तासांनंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पागर यांच्यासह प्रदेश सचिव संजय वाघ शिरसमनीकर ,डोंगर पागर,पंढरीनाथ अिहरे,शरद अहिरे,सचिन अहिरे, मधुकर अहिरे, सुदाम देवरे, युवराज शिंदे,योगेश अहिरे, दादाजी अहिरे, शेखर कापडणीस, दादाजी पगार,राजेंद्र कापडणीस,अरु ण कापडणीस,भास्कर पगार,भिला धोंडगे,बाजीराव धोंडगे, कडू धोंडगे आदी सहभागी झाले होते.बुधवारी कांद्याचे भाव पुन्हा प्रती क्विंटल दोनशे ते तीनशे रु पयांनी कोसळले आहे. शासनाने तत्काळ कांद्यावरील निर्यात मूल्य कायमस्वरूपी शून्य करावे ,जेणे करून दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल. सरकारने निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला .