‘कचऱ्यातून नंदनवन’ उपक्रम
By Admin | Updated: June 10, 2016 22:24 IST2016-06-10T22:20:13+5:302016-06-10T22:24:17+5:30
महेश नवमी : माहेश्वरी भवन येथे विविध कार्यक्रम

‘कचऱ्यातून नंदनवन’ उपक्रम
नाशिकरोड : घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी गृहिणींची असून, ती व्यवस्थितपणे नीट पार पाडल्यास कचऱ्यातून नंदनवन निर्माण होईल, असे प्रतिपादन मंजू नावंदर व किरण झंवर यांनी केले.
आर्टिलरी सेंटररोड येथील श्रीमती मोनाबाई नंदलाल राठी माहेश्वरी भवन येथे शुक्रवारी दुपारी भगवान श्री महेश नवमीनिमित्त आयोजित ‘कचऱ्यातून नंदनवन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी मंजू नावंदर व किरण झंवर यांनी उपस्थिताना प्रत्येक प्रकारचा कचरा वेगळा असतो, असे सांगून स्लाइड-शोद्वारे इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक, कुजणारा (स्वयंपाकघरातील), देवाचे निर्माल्य आदि प्रकारच्या कचऱ्याचे फायदे व तोटे स्पष्ट करून सांगितले. ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण कसे करावे तसेच स्वयंपाकघरातील कुजणारा कचरा व झाडांचा पालापाचोळा यातून खताची निर्मिती कशी करता येते याची सविस्तर माहिती नावंदर व झंवर यांनी दिली.
कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावल्यास कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन पर्यावरणाची होणारी हानी ही कमी झाल्याशिवाय राहणार नाही, असे नावंदर व झंवर यांनी स्लाइड-शोद्वारे स्पष्ट करून सांगितले.
पुणे येथील संदीप बाहेती यांचे पसायदानावरील व्याख्यान झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी प्रगती मंडळचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, अशोक भट्टड, राधेश्याम राठी, महेश बूब, मुकेश चांडक, दिनेश करवा, रमेश कासट, दीपिका कापडिया, वर्षा कलंत्री आदि मान्यवर उपस्थित होते.
परिचय श्रद्धा कासट व सूत्रसंचालन मीनल बियाणी यांनी केले. यावेळी कांता लोया, वर्षा कलंत्री, मंगल नावंदर, आशा जाजू, कल्पना लोया, अरुणा कलंत्री, शशिकला बूब, राखी लोया, स्वाती झंवर, प्रणिता भुतडा, अलका करवा, आशा राठी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)