शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंत वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:17 AM

शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

मालेगाव : शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.प्रमुख मार्गांवर बेशिस्त वाहने व हातगाड्या लावण्यासह रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या पथदीपांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहे. वाहतूक कोंडी निर्माण करणारे अडथळे दूर करण्यात यावे, मोसमपूल ते टेहरे चौफुली तसेच इतर प्रमुख रस्त्यांच्या मधोमध असलेले पथदीप व रोहित्र, रिक्षा व हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे सदर प्रमुख मार्ग या अतिक्रमणांमुळे अरूंद झाल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. मोसमपूल ते टेहरे चौफुली, रावळगाव नाका ते चर्चागेट, सोमवार बाजार, शहरातील सरदार चौक, किदवाईरोड, नवीन बसस्थानक आदी प्रमुख मार्गांवरदेखील अशीच परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. या मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास वाहने कर्णकर्कश आवाज करतात, त्याचा त्रासदेखील रुग्णांना होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांची अशीच अवस्था निर्माण झाली असून, त्याकडे मनपा व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष जनतेत असंतोष निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभागांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरित दूर करावेत.  मोसमपूल ते टेहरे चौफुली या मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते; मात्र रस्त्याच्यामध्ये असलेले पथदीप व ट्रान्सफार्मर, बेशिस्तपणे उभी केली जात असलेली वाहने व हातगाड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. दुपारी व सायंकाळी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे अपघाताचे प्रकारदेखील वाढून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे टाळले जाते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस