शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

उड्डाणपुलाच्या कामाने महामार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:24 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.

ठळक मुद्देबळीमंदिर : रोजच सायंकाळी वाहनांच्या लागतात रांगा

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, के. के. वाघ ते कोणार्कनगरपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, पण रविवारी (दि.१६) सकाळी १० वाजेच्या सुमारास बंद पडलेल्या मालवाहतूक गाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे महामार्गावरून ओझरकडे जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक बसला शिवाय बळीमंदिर ते अमृतधाम चौफुली दरम्यान अडकलेल्या वाहनांना पुढे वा मागे जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने बंद पडलेली मालवाहतूक गाडी सुरू होईपर्यंत बराचकाळ वाट पहावी लागली असल्याचे समजते. शिवाय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कर्मचाºयांनी वाहतूक के. के. वाघपासून सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली, पण अमृतधाम व रासबिहारी चौफुली येथे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पण या निमित्ताने उड्डाणपुलाचे काम करणाºया ठेकेदाराने आपत्कालीन स्थितीसाठीक्रे नची व्यवस्था होऊ शकली नसल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभ्या असलेल्या कर्मचाºयांनी धक्का मारून गाडी काढण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.त्यानंतर बराच काळानंतर धक्का मारूनच वाहन बाजूला करून मार्ग सुरळीत करण्यात आला असला तरी येथील वाहतूककोंडीची समस्या बिकट होत आहे. शिवाय अमृतधाम आणि रासबिहारी रोडने येणाºया मालवाहतूक वाहने सर्व्हिस रोडने जात येतात त्यामुळे सर्व्हिस रोड ब्लॉक होतो शिवाय त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्ग