शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

उड्डाणपुलाच्या कामाने महामार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:24 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.

ठळक मुद्देबळीमंदिर : रोजच सायंकाळी वाहनांच्या लागतात रांगा

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, के. के. वाघ ते कोणार्कनगरपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, पण रविवारी (दि.१६) सकाळी १० वाजेच्या सुमारास बंद पडलेल्या मालवाहतूक गाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे महामार्गावरून ओझरकडे जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक बसला शिवाय बळीमंदिर ते अमृतधाम चौफुली दरम्यान अडकलेल्या वाहनांना पुढे वा मागे जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने बंद पडलेली मालवाहतूक गाडी सुरू होईपर्यंत बराचकाळ वाट पहावी लागली असल्याचे समजते. शिवाय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कर्मचाºयांनी वाहतूक के. के. वाघपासून सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली, पण अमृतधाम व रासबिहारी चौफुली येथे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पण या निमित्ताने उड्डाणपुलाचे काम करणाºया ठेकेदाराने आपत्कालीन स्थितीसाठीक्रे नची व्यवस्था होऊ शकली नसल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभ्या असलेल्या कर्मचाºयांनी धक्का मारून गाडी काढण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.त्यानंतर बराच काळानंतर धक्का मारूनच वाहन बाजूला करून मार्ग सुरळीत करण्यात आला असला तरी येथील वाहतूककोंडीची समस्या बिकट होत आहे. शिवाय अमृतधाम आणि रासबिहारी रोडने येणाºया मालवाहतूक वाहने सर्व्हिस रोडने जात येतात त्यामुळे सर्व्हिस रोड ब्लॉक होतो शिवाय त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्ग