शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘बॉर्डर बंद’मुळे ऐन हंगामात टमाटा गडगडला ; शेतकºयांना आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:33 IST

गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे.

ठळक मुद्दे तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव

संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे. आॅगस्ट ते डिसेंबर असा पाच महिन्यांचा कालावधी टमाटा हंगामाचा असतो मात्र यंदा गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. इतरवेळी हंगामात एकरी किमान २०० टमाटा जाळी निघायच्या तेथे आज ५० जाळ्याच टमाटे निघाले आहेत.परतीचा पाऊस त्यातच भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने १५ आॅगस्टपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद करण्यात आल्याने पाकिस्तानला टमाटा मालाची निर्यात बंद झाली आहे. हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून अंदाजे जवळपास १०० ट्रकभर टमाटा माल दैनंदिन पाकिस्तानला रवाना केला जायचा. मात्र आता सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला टमाट्याची निर्यात सध्या बंदच आहे. ...तर टमाट्याने शंभरी गाठली असती आॅगस्ट ते डिसेंबर हा टमाट्याचा हंगाम असून, या कालावधीत मोठ्या प्रमाणात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा शेतकºयांनी टमाट्याची लागवड केली खरी, परंतु ऐनवेळी परतीच्या पावसाने टमाटा पिकाला फटका बसला. पावसामुळे टमाट्याचे उभे पीक नाश पावले. त्यातच भारत-पाकिस्तान सीमारेषा तणावामुळे बंद आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद नसती तर टमाट्याला पाकिस्तानात १४०० ते १५०० रुपये प्रति जाळी बाजारभाव मिळाला असता व नाशिकमध्ये टमाट्याने किलोमागे किमान शंभरीचा बाजारभाव तरी गाठला असता.

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी