शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉर्डर बंद’मुळे ऐन हंगामात टमाटा गडगडला ; शेतकºयांना आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:33 IST

गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे.

ठळक मुद्दे तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव

संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे. आॅगस्ट ते डिसेंबर असा पाच महिन्यांचा कालावधी टमाटा हंगामाचा असतो मात्र यंदा गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. इतरवेळी हंगामात एकरी किमान २०० टमाटा जाळी निघायच्या तेथे आज ५० जाळ्याच टमाटे निघाले आहेत.परतीचा पाऊस त्यातच भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने १५ आॅगस्टपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद करण्यात आल्याने पाकिस्तानला टमाटा मालाची निर्यात बंद झाली आहे. हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून अंदाजे जवळपास १०० ट्रकभर टमाटा माल दैनंदिन पाकिस्तानला रवाना केला जायचा. मात्र आता सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला टमाट्याची निर्यात सध्या बंदच आहे. ...तर टमाट्याने शंभरी गाठली असती आॅगस्ट ते डिसेंबर हा टमाट्याचा हंगाम असून, या कालावधीत मोठ्या प्रमाणात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा शेतकºयांनी टमाट्याची लागवड केली खरी, परंतु ऐनवेळी परतीच्या पावसाने टमाटा पिकाला फटका बसला. पावसामुळे टमाट्याचे उभे पीक नाश पावले. त्यातच भारत-पाकिस्तान सीमारेषा तणावामुळे बंद आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद नसती तर टमाट्याला पाकिस्तानात १४०० ते १५०० रुपये प्रति जाळी बाजारभाव मिळाला असता व नाशिकमध्ये टमाट्याने किलोमागे किमान शंभरीचा बाजारभाव तरी गाठला असता.

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी