शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सर्वपक्षीयांतर्फे टोलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:37 IST

इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ पासून टोलनाका बंद पाडला.

ठळक मुद्देग्रामस्थ आक्रमक : महामार्गावरील खड्ड्यांमुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप

इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ पासून टोलनाका बंद पाडला.मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सÞुमारास नांदगाव सदो येथील शिवशक्ती युवक मंडळाचे कार्यकर्ते पंढरीनाथ सुखदेव भागडे (२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने (एमएच १५ एफपी ३०४१) घरी जात असताना बोरटेंभे गावाजवळ साई कुटीरसमोर खड्ड्यात गाडीचे पुढील चाक गेल्याने ते रस्त्यात पडले. दरम्यान मागून येणारी पिकअप (एमएच ०४ जेके ६२५२) थेट त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे व संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाज व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घोटी टोल नाक्याजवळ जमून आंदोलन सुरू केले. मध्यरात्री १२ पासून वाहनधारकांकडून टोल आकारणी बंद करत टोलनाका बंद केला.सकाळी ११ वाजता टोल प्रशासनाने महामार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून पंढरीनाथ भागडे यांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर टोल सुरू करण्यात आला. याप्रसंगी उपअधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आदी उपस्थित होते. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, इगतपुरी तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, संदीप किर्वे, भागीरथ मराडे, मूलचंद भगत, प्रशांत कडू, रामदास आडोळे, भोलेनाथ चव्हाण, अ‍ॅड. हनुमंत मराडे, देवीदास आडोळे, कैलास भगत, योगेश भागडे, मनीष भगत, नामदेव भागडे, शंकर भगत, दशरथ भागडे, विठ्ठल लंगडे यांच्यासह तालुक्यातील आगरी समाज सहभागी झाला होता. पंढरीनाथ भागडे अपघाती निधनामुळे नांदगाव सदो गावावर शोककळा पसरली आहे.

मुंबई - आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.- संदीप किर्वे घोटी.

येथील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपये टोल आकारणीत होते. मात्र महामार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष दिले जात नाही. सदर खड्डे न बुजवल्यास महामार्ग बंद आंदोलन करू.- प्रशांत कडू.