शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पाण्याअभावी उन्हाळ कांदे सोडून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 6:22 PM

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.

देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सुटेल या आशेवर असलेल्या वाजगाव येथील शेतकऱ्यांवर शेतातील उन्हाळी कांदे सोडून देण्याची वेळ आली आहे.गतवर्षी पावसाळ्यात चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे वाजगाव येथील विहिरींना पाणी उतरले होते. रब्बीचा हंगाम पदरात पडेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. कारण कांदा लागवडीच्या वेळी या शेतकºयांच्या विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यात कालव्याला एक आवर्तन सोडले जात होते. यामुळे कांदा पीक सहज निघून येईल या भरवशावर शेतकरी होते.जानेवारी महिन्यात देवळा येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आले असताना वाजगाव येथील शेतकºयांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या पुढे कैफियत मांडली होती. त्यावेळी महाजन यांनी कालव्याला पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापपर्यंत कालव्याला आवर्तन सोडण्यात आले नाही. महिनाभरापासून वाजगाव परिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकºयांना संघर्ष करावा लागत आहे. चणकापूर उजव्या कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे शेतकºयांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही. यामुळे कालव्याला नियमित आवर्तने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीonionकांदा