शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

यंदा अधिक क्षमतेने गाळप होणार: श्रीराम शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:55 IST

कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य होत नव्हते. कारखान्याने आधुनिकी- करणाचे काम पूर्ण केले असून, यावर्षी अधिक क्षमतेने गाळप होणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.

ठळक मुद्देकादवा साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन

दिंडोरी : कादवा सहकारी कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना असल्याने कादवा कारखान्यास ऊस देण्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक पसंती देतात; मात्र कादवा कारखान्याची यंत्रसामग्री जुनी झाल्याने व क्षमता कमी असल्याने पुरेसे गाळप करणे यापूर्वी शक्य होत नव्हते. कारखान्याने आधुनिकी- करणाचे काम पूर्ण केले असून, यावर्षी अधिक क्षमतेने गाळप होणार असल्याचे प्रतिपादन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉयलरची पूजा सौ. व श्री. दत्तात्रय सुदामराव देशमुख (लखमापूर) व सौ. व श्री. भिकन माधवराव कोंड (करंजवण) यांच्या हस्ते झाली.श्रीराम शेटे पुढे म्हणाले की, नव्याने मिल, बॉयलर, टर्बाइन, पॅन चिमणी, आॅलिव्हर, क्रिस्टलायझर, व्हेपरसेल, शुगर ग्रेडर आदी मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप होणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात इथेनॉल प्रकल्प करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस लागवड वाढीसाठी कारखान्याने सीडफार्ममध्ये व्हीएसआय प्रमाणित नवनवीन जातींची साडेपाच लाख ऊस रोपे तयार असून, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, नरेश देशमुख, बाळासाहेब नाठे, गौतम सुराणा, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे, विश्राम दुगजे, आत्माराम जाधव, तानाजी पगार आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रेय पाटील, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापू पडोळ, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, सुनील केदार, सुनील कावळे, संपतराव पाटील, संपतराव कोंड, विलास वाळके, बबनराव देशमुख, रामदास पिंगळ, शिवाजीराव जाधव, अशोक वाघ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले.राज्यातील साखर उद्योग अडचणीतसाखर संघाने विभागवार साखर कारखान्यांच्या बैठका घेत साखर उद्योगपुढील अडचणी जाणून घेतल्या आहेत. साखरेला मिळणाºया कमी भावामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे. एफआरपी देण्यासाठी केंद्र शासन सॉफ्ट लोन देत आहे; परंतु ते कर्ज असून ते सातत्याने वाढत आहे. निर्यात केलेल्या साखरेचे पैसे मिळण्यास विलंब होत असून, परिणामी सबसिडी सोडून द्यावी लागत असल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. शासनाने साखर उद्योगाला पॅकेज देण्याची गरज असल्याचेही श्रीराम शेटे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने