शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शेतकऱ्यांना कांदा विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:59 IST

परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे.

नायगाव : परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे. कांदा रोपांच्या नुकसानीमुळे यंदा गव्हाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होण्याचे चित्र आहे.यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने कहर करून शेतपिकांचे अतोनात नुकसान केले. खरिपातील कांद्याचे हजारो हेक्टरवरील पीक नाहीसे झाले आहे. शेतकºयांनी महागड्या दराने कांदा रोपे घेऊन पुन्हा लागवड केली, मात्र परतीच्या पावसाने या कांद्याचेही नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती लाल कांद्याबरोबर उन्हाळ कांद्याची झाली आहे.शेतकºयांनी रब्बीच्या कांद्याचे महागडे बियाणे अनेकदा तयार केले, मात्र परतीच्या पावसाने खराब झाले. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामातील कांद्याचेही नियोजन कोलमडल्याने कांदा लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांनी कांदा पिकाऐवजी अन्य पिकांना पसंती दिली आहे.गव्हाचे वाढणार उत्पादनशेतकºयानी कांदा पिकाच्या क्षेत्रात यंदा गव्हाच्या पिकाला पसंती दिल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनही वाढणार असल्याचे बोलले जात आहे. येणाºया काळात शेतकºयांही कांदा विकत घेण्याची वेळ येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर नवल वाटायला नको. यावर्षी शेतकºयांबरोबरच कांदा सर्वांनाच रडविणार, असे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी