शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अवकाळी.. निर्यातबंदी, आता कोरोना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:02 PM

निफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देसंकटांची मालिका : खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.मागील आठवड्यात नांदगाव, नंदुरबार, मराठवाड्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठ्या प्रमाणातबदल घडून आले आहेत. परिसरामध्ये मागील चार-पाच दिवसांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे उभीपिके आडवी होत आहेत. यात शेतकºयांचे अतोनात नुकसान होत आहे.शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण असतानाच कोरोनामुळे बाजारामध्ये शुकशुकाट निर्माण झालेला आहे.निफाड तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाले, विहीर, तलाव, बोरवेल व इतर उपलब्ध जलाशयांमध्ये मुबलक पाणी आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड करण्यात आलेली आहे.दरम्यान, अवकाळी पावसाने हाताला आलेल्या खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. खरिपातील नुकसान विसरून शेतकºयांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा, गहू, उन्हाळी सूर्यफूल, कांदा आदी पिकांची लागवड केलेली आहे. पैकी कांदा व गहू या पिकांची विक्रमी लागवड झालेली आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.त्यातच वाहणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे उभे गव्हाचे पीक आडवे होत आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. विजेचाही खेळखंडोबारात्री गारवा, सकाळी धुके, ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता यामुळे कोणता ऋतू सुरू आहे याचे आकलन होत नाही. दिवसभरातील उन्हाच्या कडाक्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीतील गारवा उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. त्यातच विजेच्या भारनियमामुळे शेतकरी हैराण आहेत. दिवसा उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके कोमेजून जात आहे. त्यामुळे पुन्हा उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच उपलब्ध होणाºया शेतमालाला दर नसल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असताना पुन्हा कोरोनाचा फटका आहे. निर्यातबंदी उठूनही कांद्याला पाहिजे त्याप्रमाणात दर मिळत नसल्याने शेतकरी चिंंतित आहेत.बाजारपेठांमध्ये शुकशुकाटबाजारांमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे टमाट्याची आवक वाढल्याने टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करावा लागत आहे. त्यामुळे झालेला खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. निर्यातबंदी उठूनही कांद्याच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल झाल्याचे दिसून येत नाही. त्यातच कोरोना व्हायरसमुळे नाशिक जिल्ह्यात जमावबंदी लागू केल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेला शेतमाल विक्र ी करणे अत्यंत जिकिरीचे झालेले आहे. शेतमाल बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणताना झालेला खर्चही फिटत नसल्याने शेतकºयांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट दाटून आलेले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी