शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:39 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही महिन्यांपासून इंदिरानगर परिसरात पाण्याची पळवापळवी होत असून, त्यातच पाणीपुरवठा विभागाच्या व्हॉल्व्हमन व चेकर यांच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धरणांमध्ये जलसाठा मुबलक असतानाही गेल्या आठवड्यापासून आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी पाटील गार्डनसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळास बारीक धारेने पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम भरले जात असताना वापरायला पाणी आणायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे खासगी टॅँकर मागवावे लागत आहे. धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही टंचाईचा सामना करावा लागत असेल तर उन्हाळ्यात काय होणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथे मुकणे धरणातून आलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला कुलूप लावण्यात आले होते तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत होता, परंतु कुलूप काढताच पाण्याची पळवापळवी करण्यात येत आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक ३०च्या नगरसेवकांनी प्रभाग सभेत प्रशासनाला धारेवर धरलेहोते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.महापालिकेचे सर्व कर भरूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही मग कर भरायचा की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण की शहरात सगळीकडे पाणीपुरवठा सुरळीत असताना फक्त आमच्या परिसरात कायम पाणीप्रश्न निर्माण होत आहे.- कल्पना माळवे, स्थानिक रहिवासी

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी