शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:39 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात नसल्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही महिन्यांपासून इंदिरानगर परिसरात पाण्याची पळवापळवी होत असून, त्यातच पाणीपुरवठा विभागाच्या व्हॉल्व्हमन व चेकर यांच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यंदा धरणांमध्ये जलसाठा मुबलक असतानाही गेल्या आठवड्यापासून आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी पाटील गार्डनसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळास बारीक धारेने पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम भरले जात असताना वापरायला पाणी आणायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे खासगी टॅँकर मागवावे लागत आहे. धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही टंचाईचा सामना करावा लागत असेल तर उन्हाळ्यात काय होणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा येथे मुकणे धरणातून आलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला कुलूप लावण्यात आले होते तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत होता, परंतु कुलूप काढताच पाण्याची पळवापळवी करण्यात येत आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक ३०च्या नगरसेवकांनी प्रभाग सभेत प्रशासनाला धारेवर धरलेहोते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.महापालिकेचे सर्व कर भरूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही मग कर भरायचा की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण की शहरात सगळीकडे पाणीपुरवठा सुरळीत असताना फक्त आमच्या परिसरात कायम पाणीप्रश्न निर्माण होत आहे.- कल्पना माळवे, स्थानिक रहिवासी

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी