शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट सुरक्षेचे तीनतेरा; म्हणे कॅशलेस व्यवहार करा

By admin | Updated: December 31, 2016 23:16 IST

वास्तव : व्हायरसच्या धोक्यात भारताचा नंबर जगात अव्वल

सतीश डोंगरे : नाशिकनोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकार आता कॅशलेस व्यवहारावर भर देऊ पाहत असले तरी, यासाठी आवश्यक असणाऱ्या आॅनलाइन प्रणालीत भारताची अवस्था अतिशय नादारीची असून, व्हायरसच्या धोक्यात भारताचा नंबर जगात अव्वल आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षेपासून ते इंटरनेट स्पीडपर्यंत जगाच्या तुलनेत असलेले भारताचे स्थान कॅशलेश व्यवहाराविषयी शंका उपस्थित करणारेच आहे.  गेल्या काही वर्षांच्या आकडेवारींचा विचार केल्यास देशात सायबर गुन्ह्यांचा उच्चांक झपाट्याने वाढत आहे, त्यामुळेच भारत सायबर गुन्ह्यांमध्ये जगात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सायबर गुन्ह्यांची वाढ पाहता लवकरच भारत पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवू शकतो. सदर गुन्हे वाढण्याचे कारण म्हणजे यातील गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण नगण्य आहे. शिवाय यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडील यंत्रणाही कुचकामी ठरत आहे.  सध्या भारतात ८० टक्के व्यवहार रोखीत केले जातात. स्वीडनमध्ये हे प्रमाण केवळ दोन टक्केच आहे. तज्ज्ञांच्या मते सरकारने आतापासून प्रयत्न केल्यास २०२० पर्यंत रोखीत व्यवहार करण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांवर येऊ शकते. सद्यस्थितीत देशात ७४.०४ टक्के साक्षरतेचे प्रमाण असले तरी, कॅशलेश व्यवहारासाठी साक्षरतेत वाढ होणे अत्यावश्यक आहे. थोडक्यात कॅशलेसकडे वाटचाल करण्याअगोदर सरकारला यंत्रणेतील उणिवा आणि प्रगत तंत्रज्ञानाची कास धरावीच लागेल. अन्यथा उगाचच सर्वसामान्यांना कॅशलेसच्या प्रवाहात ओढण्याच्या प्रयत्नात मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ शकते. इंटरनेट डाउनलोड स्पीडचा विचार केल्यास भारताला अजून बराचसा पल्ला गाठावा लागणार आहे. कारण डाउनलोड स्पीडमध्ये जगात भारत ९६व्या क्रमांकावर असून, ‘बॅण्डविड्थ’ उपलब्धतेत भारत १०५व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपल्या शेजारील नेपाळ आणि बांग्लादेश या लहान देशांनी इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये भारतापेक्षा चांगली प्रगती केली आहे. त्याचबरोबर बॅण्डविड्थ उपलब्धतेत श्रीलंका, चीन, साउथ कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया हे देश भारताच्या तुलनेत पुढे आहेत.धक्कादायक बाब म्हणजे ‘रॅनसमवेअर अटेक्स’मध्ये (कॉम्प्युटर व्हायरसचा प्रकार) भारत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे आॅनलाइन व्यवहार करताना प्रचंड खबरदारी घ्यावी लागणार आहे. एव्हाना सरकारलाच या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी तशा प्रकारची यंत्रणा उभारावी लागणार आहे. अन्यथा सायबर गुन्ह्यांमध्ये भारत जगात पहिल्या स्थानावर येण्यास फारसा कालावधी लागणार नाही.