शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

तीन तालुक्यांत पीक कापणी प्रयोग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:26 IST

संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांचा सवालसहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : राज्य सरकारची महसूल यंत्रणा विश्वासार्ह असूनही सरकारकडून महसूल यंत्रणेवर का विश्वास ठेवला जात नाही, त्याचबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.पत्रात पुढे म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून ऐन पावसाळ्यात २३८ गावे व वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांचा चारा आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. राज्यात तीव्र पाणीटंचाई असूनही दुष्काळ जाहीर करण्यासाठी विलंब केला जात आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी, पेरणी (लागवड) क्षेत्र, मृद आर्द्रता व पिकांची स्थिती हे प्रमुख निर्देशांक आहेत. त्यानुसार, ‘केंद्राच्या नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग’ या संस्थेकडून पीक पाण्याच्या स्थितीबाबत राज्य शासनाला अहवाल आल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याने हा प्रकार म्हणजे एकप्रकारे राज्यातील महसूल यंत्रणेवर अविश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.एकीकडे एवढा गंभीर दुष्काळ असताना दुसरीकडे अनेक बँका व पतसंस्थांकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. दुष्काळामध्ये बँकेची कर्जवसुलीची नोटीस पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीने आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. विजेची थकबाकी असलेल्या शेतकºयांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. अघोषित वीज भारनियमनामुळे राज्यातील नागरिक हैराण झालेले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकºयांना कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये यासाठी राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू करण्याची आवश्यकता असल्याची त्यांनी मागणी केली आहे.दुष्काळी स्थिती भयावहचांदवड व येवला तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, पीक पाहणी अहवालानुसार अत्यंत गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती आहे आणि महसूल यंत्रणेने जिल्हा प्रशासनास तसा अहवालही पाठविलेला आहे. दुष्काळी स्थिती एवढी भयावह असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ नांदगाव, मालेगाव व सिन्नर या तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश दिल्याने त्यावरही भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस