जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या तीन जागा बिनविरोध?
By Admin | Updated: August 25, 2015 23:39 IST2015-08-25T23:38:39+5:302015-08-25T23:39:07+5:30
जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या तीन जागा बिनविरोध?

जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या तीन जागा बिनविरोध?
नाशिक : जिल्हा खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी (दि.२५) अंतिम दिवशी १३ जागांसाठी २० उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले. त्यातील दोन महिला राखीव व अनुसूचित जाती संवर्गातील एका जागेसाठी तीनच अर्ज आल्याने या तीनही जागा बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. उर्वरित दहा जागांसाठी १७ उमेदवारांचे २१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. येत्या २० सप्टेंबर रोेजी दहा जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोरसे यांनी दिली.
जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. त्यात सर्वसाधारण संवर्गातील आठ जागांसाठी १५ उमेदवारांचे १६ अर्ज आले. त्यात शंकरराव बर्वे, प्रकाश तांबट, प्रवीण कोठावदे, प्रमोद गर्गे, मकरंद
सुखात्मे, वसंतराव हुदलीकर, दिलीप मोरे, भास्कर जाधव, काशीनाथ निमसे, पद्माकर पाटील, केदारनाथ सूर्यवंशी, कैलास सोनवणे, शिवाजीराव गाडे, अजय तांबट, अशोक करंजकर यांचा समावेश आहे. दोन महिला राखीव गटासाठी मानिनी कंसारा व अंजली आमले या दोन महिला उमेदवारांचेच अर्ज आले.
तसेच अनुसूचित जाती जमाती संवर्गातून नगरसेवक परशुराम वाघेरे यांचा एकमेव अर्ज आहे. त्यामुळे या तीनही जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. तसेच इतर मागास वर्गीय संवर्गातील एका जागेसाठी दिलीप मोरे, केदारनाथ सूर्यवंशी व संतोष सोनवणे हे तीन अर्ज दाखल झाले आहेत.
भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी रमेशचंद्र घुगे व अशोक करंजकर हे दोन अर्ज शिल्लक आहेत. २६ आॅगस्ट रोजी छाननी होणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी खादी ग्रामोद्योग संघासाठी मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)