शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एसटीतील प्रवाशाची तीन लाखांची बॅग परत; लाख’मोलाचा प्रामाणिकपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 01:33 IST

वेतनाच्या आक्रोशातही या कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा एस.टी. विषयी विश्वासार्हता निर्माण करणारा ठरला आहे. 

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने दिवाळीच्या तोंडावर घरात अंधार पसरलेला. ड्युटी मिळेलच याचीही शाश्वती नाही. घामाच्या पैशांसाठी कुटुंबीयांसह एसटी कर्मचारी आक्रोश  आंदोलन करीत असताना बसमध्ये राहिलेली एका प्रवाशाची तीन लाखांची बॅग चालक व वाहकांनी  परत करून आपल्या कर्तव्याचे प्रामाणिक दर्शन घडविले. वेतनाच्या आक्रोशातही या कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा एस.टी. विषयी विश्वासार्हता निर्माण करणारा ठरला आहे. 

रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाडा आगाराची अक्कलकुवा बस नाशिकला दाखल झाली. त्यातून सुरेश सोहली हे प्रवासी उतरले आणि बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. काही वेळानंतर सोहली यांना आपली तीन लाख रुपये असलेली पैशांची बॅग बसमध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी वाहतूक नियंत्रक आर. एम. मथुरे यांना कळविले. 

मथुरे यांनी वाडा येथील आगाराशी संपर्क करून वाडा-अक्कलकुवा मालेगावमार्गे निघालेल्या वाहकाचा मोबाईल क्रमांक मिळविला.  वाहकाशी संपर्क करून  बसमधील बॅग ताब्यात घेण्यास सांगितले. बसमध्ये नवीन प्रवासी बसण्यापूर्वीच पैशांची बॅग वाहकाने ताब्यात घेतली. सोहली यांना मालेगाव येथे पाठविले.  तेथे त्यांना बसचे वाहक  गणेश आसाराम धनगर आणि चालक सदानंद आत्माराम  गुरव यांनी तीन लाख तीनशे रुपयांची रोकड असलेली बॅग परत केली. 

टॅग्स :Nashikनाशिक