शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वनोलीजवळ अपघातात तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:40 IST

औंदाणे/विरगाव : साक्री-शिर्र्डी राष्ट्रीय महा महामार्गावर वनोली (ता.बागलाण) या गावाजवळ गुरुवारी (दिं.२४)रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मालट्रक व शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ हुन अधिक मजूर ही गंभीर जखमी झाले असून या सर्व गंभीर जखमींवर मालेगाव येथे उपचार केले जात आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला आहे.

ठळक मुद्दे१५ मजूर जखमी : ट्रक - पिक अप यांच्यात धडक, खड्डे चुकविण्याच्या नादात भीषण अपघात

औंदाणे/विरगाव : साक्री-शिर्र्डी राष्ट्रीय महा महामार्गावर वनोली (ता.बागलाण) या गावाजवळ गुरुवारी (दिं.२४)रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मालट्रक व शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ हुन अधिक मजूर ही गंभीर जखमी झाले असून या सर्व गंभीर जखमींवर मालेगाव येथे उपचार केले जात आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथून शेतीकाम संपवून शिरवाडे (ता.साक्री) येथील मजूर गुरुवारी पीकअप (एम.एच.१५ एफ.व्ही. ४८३९) या वाहनाने सायंकाळी घराकडे परतत होते. यावेळी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वनोली (ता.बागलाण) या गावाजवळील म्हसोबा मंदिराजवळ खड्डे चुकविण्याच्या नादात पिक अप समोरून येणाऱ्या मालट्रक (टी. एन.८८ वाय.८३९९) च्या मागील चाकावर जाऊन आदळला. हा अपघात अत्यंत भीषण असल्याने यावेळी पिकअप थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली तर माल ट्रकचे मागील टायर फुटले. यावेळी पिकअप मधील सुमारे तीस ते चाळीसहुन अधिक मजूर रस्त्यावर फेकले जाऊन यात कान्हू आहिरे या मजुराचा यात जागीच मृत्यू झाला. तर २० हुन अधिक जखमींना तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले असता यातील २ जणांचाही ही यात मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या आता एकूण ३ झाली आहे. सटाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून ट्रकचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा.पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली बिट पोलीस भामरे व बस्ते पुढील तपास करीत आहेत.***********************रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम चालू असतांना नूतन ठेकेदाराकडून रस्त्याची साधी डागडुजीही केली जात नसल्याने सटाणा ते ताहाराबाद हा मार्ग वाहनधारकांसाठी अक्षरश: मृत्यूचा साफळा बनला आहे. मात्र गुरुवारी रात्री सदर अपघात घडताच ठेकेदाराला अखेर जाग आली असून शुक्रवारी (दिं २५) या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास भल्या पहाटेपासूनच सुरुवात झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू