शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

तीन धरणे १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:26 IST

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर कायम : दहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली असली तरी कळवण, बागलाण, निफाड, देवळा येथे अपेक्षित पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसत आहे. गंगापूर धरणाची पाण्याची पातळी ८४ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ५३१० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. करंजवन ६८ टक्के भरले आहे.येथील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या २२६३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भावली धरण ८७ टक्के भरले आहे तर येथून १३,०५८ क्यूसेक, वालदेवी प्रकल्पातून ४०७, कडवा धरणातून ७०५६ तर नांदूरमधमेश्वरमधून ४६९८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाची टक्केवारीनाशिक : ३१.४, इगतपुरी : १३४.०,त्र्यंबकेश्वर : ७९.०, दिंडोरी : २९.०, पेठ : ५५.१, निफाड : ९.७, सिन्नर : २६.०, चांदवड : ११.०, देवळा : ३.४, येवला : ९.८, नांदगाव : ९.०, मालेगाव : १८.०, बागलाण : ६.०, कळवण : ७.०, सुरगाणा : ५२.३. जिल्ह्यात आता पर्यत झालेल्या पावसाने काही तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण २४ धरणांच्या पाण्याची टक्केवारी ४८ टक्के इतकी असून, मागीलवर्षी जुलैमध्ये ५६ टक्के इतका पाणीसाठा होता. काही भागात जोरदार पाऊस तर काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस असल्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे पुढील चोवीस तासात जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.