शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

तीन धरणे १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:26 IST

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर कायम : दहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली असली तरी कळवण, बागलाण, निफाड, देवळा येथे अपेक्षित पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसत आहे. गंगापूर धरणाची पाण्याची पातळी ८४ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ५३१० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. करंजवन ६८ टक्के भरले आहे.येथील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या २२६३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भावली धरण ८७ टक्के भरले आहे तर येथून १३,०५८ क्यूसेक, वालदेवी प्रकल्पातून ४०७, कडवा धरणातून ७०५६ तर नांदूरमधमेश्वरमधून ४६९८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाची टक्केवारीनाशिक : ३१.४, इगतपुरी : १३४.०,त्र्यंबकेश्वर : ७९.०, दिंडोरी : २९.०, पेठ : ५५.१, निफाड : ९.७, सिन्नर : २६.०, चांदवड : ११.०, देवळा : ३.४, येवला : ९.८, नांदगाव : ९.०, मालेगाव : १८.०, बागलाण : ६.०, कळवण : ७.०, सुरगाणा : ५२.३. जिल्ह्यात आता पर्यत झालेल्या पावसाने काही तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण २४ धरणांच्या पाण्याची टक्केवारी ४८ टक्के इतकी असून, मागीलवर्षी जुलैमध्ये ५६ टक्के इतका पाणीसाठा होता. काही भागात जोरदार पाऊस तर काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस असल्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे पुढील चोवीस तासात जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.