शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

तीन धरणे १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:26 IST

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर कायम : दहा प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आळंदी, वालदेवी व भावली हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तर गंगापूर, दारणा धरणांचा साठा नव्वदीकडे सरकत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील विसर्ग मात्र कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असला तरी अन्य तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली असली तरी कळवण, बागलाण, निफाड, देवळा येथे अपेक्षित पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसत आहे. गंगापूर धरणाची पाण्याची पातळी ८४ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ५३१० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. करंजवन ६८ टक्के भरले आहे.येथील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या २२६३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. भावली धरण ८७ टक्के भरले आहे तर येथून १३,०५८ क्यूसेक, वालदेवी प्रकल्पातून ४०७, कडवा धरणातून ७०५६ तर नांदूरमधमेश्वरमधून ४६९८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाची टक्केवारीनाशिक : ३१.४, इगतपुरी : १३४.०,त्र्यंबकेश्वर : ७९.०, दिंडोरी : २९.०, पेठ : ५५.१, निफाड : ९.७, सिन्नर : २६.०, चांदवड : ११.०, देवळा : ३.४, येवला : ९.८, नांदगाव : ९.०, मालेगाव : १८.०, बागलाण : ६.०, कळवण : ७.०, सुरगाणा : ५२.३. जिल्ह्यात आता पर्यत झालेल्या पावसाने काही तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील एकूण २४ धरणांच्या पाण्याची टक्केवारी ४८ टक्के इतकी असून, मागीलवर्षी जुलैमध्ये ५६ टक्के इतका पाणीसाठा होता. काही भागात जोरदार पाऊस तर काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस असल्यामुळे अजूनही धरणांच्या पाणीसाठ्यात पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे पुढील चोवीस तासात जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील अनेक धरणांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.