शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर आगाराला तीन कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:44 IST

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सिन्नर आगाराला विविध मार्गावर धावणाऱ्या फेऱ्यांतून दररोज अंदाजे तीन लाखांचे उत्पन्न मिळते. ग्रामीण व शहरी भागातदेखील नागरिकांना लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्ह्यात ‘रेड झोन’ असल्याने सध्यातरी एसटी धावणार नाही. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारखाने मर्यादित कामगारांवर सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकºयांना बाजार समिती, बँक, दवाखाने, किरकोळ भाजीपाला, शेतीची उत्पादने विकण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी शहरात येण्याचा एकमेव आधार लालपरीचाच आहे. लॉकडाऊनमुळे आगारातील ७३ बसेस जागेवरच थांबलेल्या आहेत. येथून रोज पुणे, नाशिक, मुंबईदरम्यान लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशांना घेऊन जाणाºया बसेस आजही आगारात उभ्या आहे.सिन्नर आगारामध्ये ५० तांत्रिक कर्मचाºयांची संख्या आहे. आगारातील वर्कशॉपमधील कर्मचारी रोज न चुकता वर्कशॉप मध्ये येऊन बंद स्थितीत असणाºया बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून रोज बसेस चालू-बंद करत आहेत. बॅटºयांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रोज सुमारे ६ लाखांचे उत्पन्न देणाºया या बसेस आगारामध्ये थांबून आहेत. आगारातील ३०० चालक-वाहक आज घरी बसून आहेत. बसेस बंद असल्याने पार्सल सुविधाही बंद झाली असून, त्या उत्पन्नावरही एस.टी.ला पाणी सोडावे लागले आहे.----------------------दररोज तीन लाखांच्या उत्पन्नावर पाणीसिन्नर आगारामध्ये १४५ वाहक व १५५ चालक आहेत. त्यात काही तालुक्यात जाणारे व इतर काही लांब पल्ल्याच्या मार्गावर बसची ने-आण करणारे वाहनचालक आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन वाहक-चालक आणि कर्मचाºयांना देण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचेही वेतन येत्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता असून, ते कर्मचाºयांना तातडीने देण्यात येईल. अनेक गावांमध्ये शालेय विद्यार्थी, नागरिक, कामगार अडकले असून, नागरिकांनी शासकीय नियमांची पूर्तता करून बसची मागणी नोंदवल्यास ग्रुपप्रमाणे ५० टक्के आसनक्षमतेनुसार बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नागरिकांनी यासंदर्भात आगारात संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक