शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

सिन्नर आगाराला तीन कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:44 IST

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सिन्नर आगाराला विविध मार्गावर धावणाऱ्या फेऱ्यांतून दररोज अंदाजे तीन लाखांचे उत्पन्न मिळते. ग्रामीण व शहरी भागातदेखील नागरिकांना लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. जिल्ह्यात ‘रेड झोन’ असल्याने सध्यातरी एसटी धावणार नाही. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारखाने मर्यादित कामगारांवर सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकºयांना बाजार समिती, बँक, दवाखाने, किरकोळ भाजीपाला, शेतीची उत्पादने विकण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी शहरात येण्याचा एकमेव आधार लालपरीचाच आहे. लॉकडाऊनमुळे आगारातील ७३ बसेस जागेवरच थांबलेल्या आहेत. येथून रोज पुणे, नाशिक, मुंबईदरम्यान लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशांना घेऊन जाणाºया बसेस आजही आगारात उभ्या आहे.सिन्नर आगारामध्ये ५० तांत्रिक कर्मचाºयांची संख्या आहे. आगारातील वर्कशॉपमधील कर्मचारी रोज न चुकता वर्कशॉप मध्ये येऊन बंद स्थितीत असणाºया बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून रोज बसेस चालू-बंद करत आहेत. बॅटºयांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रोज सुमारे ६ लाखांचे उत्पन्न देणाºया या बसेस आगारामध्ये थांबून आहेत. आगारातील ३०० चालक-वाहक आज घरी बसून आहेत. बसेस बंद असल्याने पार्सल सुविधाही बंद झाली असून, त्या उत्पन्नावरही एस.टी.ला पाणी सोडावे लागले आहे.----------------------दररोज तीन लाखांच्या उत्पन्नावर पाणीसिन्नर आगारामध्ये १४५ वाहक व १५५ चालक आहेत. त्यात काही तालुक्यात जाणारे व इतर काही लांब पल्ल्याच्या मार्गावर बसची ने-आण करणारे वाहनचालक आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन वाहक-चालक आणि कर्मचाºयांना देण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचेही वेतन येत्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता असून, ते कर्मचाºयांना तातडीने देण्यात येईल. अनेक गावांमध्ये शालेय विद्यार्थी, नागरिक, कामगार अडकले असून, नागरिकांनी शासकीय नियमांची पूर्तता करून बसची मागणी नोंदवल्यास ग्रुपप्रमाणे ५० टक्के आसनक्षमतेनुसार बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नागरिकांनी यासंदर्भात आगारात संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक