साडे तीन हजार हेक्टर हरभरा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:52 PM2020-02-01T12:52:08+5:302020-02-01T12:52:59+5:30

पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत्पादनात निम्याने घट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

 Three and a half thousand hectares of green crops are in danger | साडे तीन हजार हेक्टर हरभरा पिक धोक्यात

साडे तीन हजार हेक्टर हरभरा पिक धोक्यात

Next

पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत्पादनात निम्याने घट येणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून तो पूर्णत: हवालदिल झाला आहे. मागील वर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेल्या खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असे असतांनाही शेतकरी वर्गाने नाउमेद न होता रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करीत , गहू, हरभरा,ज्वारी आदि पिकांची शेतात मोठया प्रमाणात पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली व पिकेही चांगली आली. मात्र त्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तसेच दव ,थंडी व उष्ण वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गाने विविध प्रकारची बुरशीनाशके,किटकनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले.आता हरभरा पिकाला फुलोरा लागला असून काही ठिकाणी घाटे लागले आहेत. मात्र हरभरा पिकावर अळीचा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.माव्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे तर अळी पाने व घाटे कुरतडले आहे.औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. अळी ही घाट्याच्या आतमध्ये जात असल्याने औषध फवारणीचा अळीवर परिणाम होत नाही.तसेच हवामानात दिवसातून तीन ते चार वेळेस बदल होत असल्याने पिकाचा बचाव कसा करावा ? असा यक्ष प्रश्न उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. या अळीमुळे हरभरा उत्पादनात निम्याने घट येणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title:  Three and a half thousand hectares of green crops are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक