शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गोदावरी नदीत दूषित पाणीहजारो मासे पडले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 3:15 PM

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे ...

ठळक मुद्देकूपनलीकेद्वारे पाणी पुरवठा असणाऱ्या गावांना आरोग्याचा धोका

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाले असून नदीच्या काठावरआल्यामुळे सर्वत्र दुर्गन्धी पसरली आहे.गोदावरी नदीच्या काठावरून अनेक गावांना कूपनलिकेद्वारे पाईपलाईन करुन पाणी पुरवठा केला आहे. जवळपासच्या अनेक गावांना येथून पिण्यासाठी पाणी पुरविले जाते तर शेतीला सुद्धा हेच पाणी असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.नाशिक शहरातील अनेक केमिकल युक्त औषध, कीटकनाशक कंपन्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जाते. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील सांडपाणी याच नदीत येऊन मिळते, त्यामुळे पाणी वारंवार दूषित होते. चाटोरीपासून तर करंजगावपर्यत जवळपास वीस किलोमीटर अंतर पानवेलीने व्यापून टाकले आहे. या भागात नदी आहे की हिरवा गालीच्या हेच लक्षात येत नाही, त्यामुळे पानवेल खराब होण्याची शक्यता अधिक आहे.केमिकल युक्त पाणी की पानवेल सडल्यामुळे पाणी दूषित झाले याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आज मात्र लाखो मासे मरण पावले, तर मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषीवर कारवाई करावी, नागरिक आणि मुके प्राणी यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहेचौकट...तामसवाडी शिवारात गोदावरी नदीत दूषित पाणी आले असून केमिकल युक्त पाणी असल्यामुळे अनेक मासे मृत झाले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित दोषी यांच्यावर कारवाई करावी- दत्ता आरोटे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संगटना.(१६ सायखेडा)तामसवाडी शिवारात दूषित झालेले पाणी आणि मृत मासे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणgodavariगोदावरी