शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्ट : अभयारण्यांसह गड-किल्ल्यांवर मुक्काम कराल तर शिक्षा भोगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 16:56 IST

नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही

ठळक मुद्देअभयारण्यक्षेत्रात वन्यजीवांचा धोका अभयारण्यक्षेत्रात रात्रीचा मुक्काम टाळावाधुम्रपान, मद्यप्राशन, बारबेक्यू पेटविण्यावर कायद्याने निर्बंध

नाशिक : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हैशी पर्यटकांचा हैदोस रोखण्यासाठी नाशिक वन-वन्यजीव विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली वनपाल, वनरक्षकांचे विशेष गस्ती पथके कार्यान्वित केली आहे. तसेच सुर्यास्तानंतर अभयारण्यक्षेत्र व गड-किल्ल्यांवर मुक्काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे प्रभारी मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे.नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही, असे वन्यजीव विभागाने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. तसेच विभागातील विविध गड-किल्ले तसेच पायथ्यांभोवती असलेल्या राखीव वनांमध्येही मुक्काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.३१डिसेंबरची रात्र साजरा करण्यासाठी हौशी पर्यटकांनी अभयारण्यक्षेत्र, गड-किल्ले, धरणकिनारे अशी ठिकाणे निवडू नये, जेणेक रून कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडणार नाही. रात्रीच्यावेळी अभयारण्यक्षेत्रात वन्यजीवांचा धोका अधिक वाढलेला असतो. तसेच गड-किल्ल्यांच्या परिसरातदेखील अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सुजाण पर्यटकांनी वन्यजीव व वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पर्यटकांसह दुर्गप्रेमींनी अभयारण्य व गड-किल्लयांच्या परिसरातून सुर्यास्ताअगोदरच निघून जावे. संध्याकाळनंतर अभयारण्यक्षेत्र व गड-किल्ल्यांवर थांबू नये, अन्यथा नाशिक मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव संरक्षकांच्या आदेशानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७नुसार कारवाई करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. नाशिक वन्यजीव विभागांतर्गत कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा समावेश होतो. या अभयारण्यक्षेत्रात भंडारदरा धरणाभोवतालची सांदण दरी, घाटघर, पांजरे, उडदावणे, मुतखेल, रतनवाडी आदि गावे येतात. या सर्व गावांच्या परिसरात थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांचा लोंढा वाढलेला असतो. मात्र पर्यटकांनी अभयारण्यक्षेत्रात रात्रीचा मुक्काम टाळावा तसेच रात्री या भागात वाहनांची गर्दी करू नये. कुुठल्याहीप्रकारे धुम्रपान, मद्यप्राशन, बारबेक्यू अभयारण्यक्षेत्रात पेटविण्यावर कायद्याने निर्बंध घालण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्यटकांनी हुल्लडबाजी टाळावी, जेणेकरून वन्यजीवांना धोका पोहचणार नाही. तसेच वनसंपदाही सुरक्षित राहण्यास मदत होईल. येथील हैदोसवर राजूर पोलीस ठाणे, वन-वन्यजीव विभागासह, ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या सदस्यांमार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरNew Yearनववर्ष