शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसात एकाच ठिकाणी तिसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:58 IST

सायखेडा : महाजनपुर शिवारात पंधरा दिवसात एकाच शेतात एकाच ठिकाणी तिसरा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याची भीती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सायखेडा : महाजनपुर शिवारात पंधरा दिवसात एकाच शेतात एकाच ठिकाणी तिसरा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याची भीती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनक्षेत्र कमी झाल्याने भक्षाच्या शोधात बिबट्यानी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्या सातत्याने येतो. मात्र महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर व बागलवाडी शिवारात सातत्याने दुष्काळ परिस्थितीमुळे ऊसाचे क्षेत्र नाही. शिवाय टेकडी, डोंगर,दाट झाडी असा कोणताही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नाशिक महानगर पालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर ,शेतात फिरताना दिसतात. बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील पिकांचे कामे शेतात सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकºयांना शेतात जावे लागते. वन विभागाच्या अधिकाºयांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे. या भागात बिबटे सोडू नये अन्यथा गावातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच आशा बचवंत फड, भगवान ताडगे, योगेश फड,राहुल फड,संपत फड, किरण फड,संदीप फड, साहेबराव फड यांनी दिला आहे.----------------------------मजबूत पिंजरा लावण्याची मागणीवनविभागामार्फत लावण्यात आलेल्या पिंजºयाची कडी अचानक निघाल्याने बिबट्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आलेला होता. बिबट्याला पहाण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत बिबट्या बाहेर आला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने बिबट्याच्य दणक्याने कडी लागली गेल्याने अनर्थ टळला, यापुढे मात्र वनविभागाने मजबूत पिंजरा लावावा.-भगवान ताडगे, नागरिक, महाजनपुर

टॅग्स :Nashikनाशिक