शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

त्यामुळेच राज्यात स्वतंत्र औद्योगिक नगरीसाठी दिला प्रस्ताव : मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 16:29 IST

नाशिक- राज्यात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. विशेषत: अनेक ठिंकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून औद्योगिक नगरी स्वतंत्र करण्यासाठी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची या मागील भूमिका काय, याबाबतचा हा संवाद...

ठळक मुद्दे मूलभूत नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीतकरवाढ तर्कसंगत नाही

नाशिक - राज्यात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. विशेषत: अनेक ठिंकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून औद्योगिक नगरी स्वतंत्र करण्यासाठी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची या मागील भूमिका काय, याबाबतचा हा संवाद...राज्यातील औद्योगिक क्षेत्रे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून वेगळी करण्याची मागणी अचानक करण्यामागे कारण काय?मंडलेचा-  राज्यात विविध भागात औद्योगिक वसाहती विखुरलेल्या आहेत. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या अर्थकारणात महत्त्वाच्या असलेल्या या औद्योगिक वसाहतींच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. विशेषत: मूलभूत नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत, ही खूप मोठी अडचण आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कर आकारणी मोठ्या प्रमाणात करतात. परंतु औद्योगिक क्षेत्रात रस्ते, स्वच्छता किंवा अन्य सुविधा देण्याची वेळ आल्यानंतर मात्र प्रतिसाद मिळत नाही. संगमनेर येथे अनेक वर्षे औद्योगिक क्षेत्रात एकूणच सहा लाख रुपयांची घरपट्टी आकारली जात होती. परंतु आता शासनाने रेडिरेकनरचे दर लागू केल्याने थेट ६५ लाख रुपयांची पट्टी आकारण्यात येत आहे. सहा लाखांवरून थेट ६५ लाख रुपयापर्यंत करवाढ करण्यात तर्कसंगत काहीच नाही आणि दुसरीकडे सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चेंबरच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यावेळी त्यांच्याकडे औद्योगिक नगरीची मागणी केली.

हे फक्त संगमनेरलाच घडले असेल, तर राज्यात अन्यत्रदेखील अशाप्रकारे करण्याचे कारण काय ?मंडलेचा-  संगमनेर येथील औद्योगिक वसाहतीच्या बाबतीतच हे घडले असे नाही. तर राज्यात सर्वत्र हाच प्रकार आहे. नाशिकमध्येसुद्धा अनेकदा तक्रारी करून महापालिका कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करीत नाहीत. डीजीपीनगर ते अंबड औद्योगिक वसाहत आणि तेथून एक्स्लो पॉइंटपर्यंत रस्ता रुंदीकरण करावे, अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे; परंतु प्रतिसाद मिळत नाही. असे अनेक ठिंकाणी होत आहे. संगमनेर प्रमाणेच अन्य ठिकाणचे उद्योजकदेखील त्रस्त आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र औद्योगिक नगरीचा प्रस्ताव आहे.

स्वतंत्र औद्योगिक नगरीबाबत शासनाचा प्रतिसाद कसा आहे ?मंडलेचा-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी राज्यात दोन ते तीन ठिंकाणी स्वतंत्र औद्योगिक नगरी प्रायोगिक तत्त्वावर स्थापन करून बघू, असे सांगितले आणि तसा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सध्या मी संगमनेर, शेगाव, अकोट, अमरावती अशा विविध ठिकाणी दौरे करून स्थानिक उद्योजकांच्या भावना जाणून घेत आहे. त्यानुसारच येत्या एक-दीड महिन्यात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर करणार आहे.

स्थानिकांना रोजगार न दिल्यास जीएसटीचा परतावा दिला जाणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे, त्याबाबत काय मत?मंडलेचा- उद्योजक आपापल्या परीने स्थानिक युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विनाकारण कोणाला डावलले जात नाही. मात्र कुशल कारागीर कारखान्याला हवे असतील ते कौशल्य स्थानिक युवकांत नसेल तर पर्याय नाही. अर्थात रोजगाराच्या कारणासाठी जीएसटीचा परतावा नाकारणे हे पर्याय योग्य वाटत नाही. उद्योजकांना सुविधा मिळत नाही, म्हणून ते शासनाचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाकारतात काय, त्याचाही विचार करावा.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसायGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस