शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा भासणार तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:27 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात सुमारे दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्या शक्यतादीड हजार क्विंटल बियाणे कमी उपलब्ध होण्याचे संकेत

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात सुमारे दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला महाबीजकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरीही घरगुती बियाणे वापराच्या तयारीत आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी महाबिज ८ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याची, ४ हजार पाचशे क्विंटल, मका पाचशे क्विंटल व ज्वारी ५० क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे महाबिहला यावर्षी खरिप पेरणीसाठी बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु यावर्षी सोयाबीनचे ६ हजार पाचशे क्विंटल,भाताचे ५ हजार क्विंटल, मका पाचशे व ज्वारी ५० क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गीरी यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शेतकऱ्यांची बियाणे तसेच खते खरेदी करताना तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाउनमधून कृषी विषयक बाबींना वगळले असले, तरी प्रत्यक्षात लॉकडाउनचा परिणाम बियाणे व खते खरेदीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात सोयाबीन उत्पादक शेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच घरगुती बियाणे पेरणीयोग्य असल्याने शेतकरी व कृषी विभाग त्या दष्टीने तयारीला लागला आहे. घरात असलेले सोयाबीन पेरणीयोग्य आहे का याबाबत शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जात आहे. त्यासाठी कुंडीत घरातील बियाण्याची उगवण करून शंभर पैकी ७० बियांची उगवण झाल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. कोट - गतवर्षी सोयाबिन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे व हवामानातील अनियमित बदलांमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. त्याचा परिणाम बियाणे निर्मिती वरही झाल्याने मागणीच्या तुलनेत कमी बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पॅकिंगच्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याची कुंडीत उगवण क्षमता तपासून पेरणी करण्यास हरकत नाही.

जगदीश गिरी - नाशिक जिल्हा व्यवस्थापक, 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी