शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा भासणार तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:27 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात सुमारे दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्या शक्यतादीड हजार क्विंटल बियाणे कमी उपलब्ध होण्याचे संकेत

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात सुमारे दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला महाबीजकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरीही घरगुती बियाणे वापराच्या तयारीत आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी महाबिज ८ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याची, ४ हजार पाचशे क्विंटल, मका पाचशे क्विंटल व ज्वारी ५० क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे महाबिहला यावर्षी खरिप पेरणीसाठी बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु यावर्षी सोयाबीनचे ६ हजार पाचशे क्विंटल,भाताचे ५ हजार क्विंटल, मका पाचशे व ज्वारी ५० क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गीरी यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शेतकऱ्यांची बियाणे तसेच खते खरेदी करताना तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाउनमधून कृषी विषयक बाबींना वगळले असले, तरी प्रत्यक्षात लॉकडाउनचा परिणाम बियाणे व खते खरेदीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात सोयाबीन उत्पादक शेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच घरगुती बियाणे पेरणीयोग्य असल्याने शेतकरी व कृषी विभाग त्या दष्टीने तयारीला लागला आहे. घरात असलेले सोयाबीन पेरणीयोग्य आहे का याबाबत शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जात आहे. त्यासाठी कुंडीत घरातील बियाण्याची उगवण करून शंभर पैकी ७० बियांची उगवण झाल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. कोट - गतवर्षी सोयाबिन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे व हवामानातील अनियमित बदलांमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. त्याचा परिणाम बियाणे निर्मिती वरही झाल्याने मागणीच्या तुलनेत कमी बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पॅकिंगच्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याची कुंडीत उगवण क्षमता तपासून पेरणी करण्यास हरकत नाही.

जगदीश गिरी - नाशिक जिल्हा व्यवस्थापक, 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी