शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

भोंगे हटवण्याची मागणीच नव्हती निर्णय कसा घेणार? : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 01:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्मरण झाल्याची कारणमिमांसा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.

 

राणा यांनी नोंदविलेला आक्षेप हा खार पोलीस ठाण्यातील नसून सांताक्रूज पोलीस ठाण्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या आराेपासंदर्भातील मुद्द्यांची तपासणी करायची असल्यास सांताक्रूज पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केेले. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई होत नाही, हा आक्षेप चुकीचा असून ज्यांच्याबाबत आक्षेप आहे, त्यांच्याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यास ईडीकडून त्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात असेल तर त्यांची चौकशी होईल, असेही महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, रंजना भानसी, सुजाता करजगीकर, प्रशांत जाधव, सुनील केदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

इन्फो

पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरीचा नवीन पॅटर्न सत्ताधारी हे पोलिसांना हाताशी धरून किंवा पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी करीत असल्याचे आघाडी शासनाच्या काळात दिसून येत आहे. जर तुम्ही राज्य शासनाच्या विरोधात बोललात तर हल्ला चढवू अशाच प्रकारचे कामकाज सध्या राज्यात सुरू असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. वाटेल ते गुन्हे नोंदवायचे, त्यासाठी पोलिसांचा वापर करायचा. माझ्याबाबतही तेच झालं असून

पेन ड्राईव्ह मधून सत्य समोर आले असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.

इन्पो

राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका नाही

राज्यातील घटनाक्रम पाहता खोटे बोला पण रेटून बोला अशा प्रकारची राज्य शासनाची कार्यपद्धती आहे. राज्यातली स्थिती योग्य नाही.

 

मंत्री जेल मध्ये,हल्ले करायचे,फक्त राजकारण करायचे हेच सुरू आहे. दरोडा पडला तरी भाजपा,चोरी झाली तरी भाजपा, बलात्कार झाला तरी भाजपा असे काही झालं की भाजपकडे बोट दाखवायचे असे प्रकार सुरू आहे. तरीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी,अशी आमची भूमिका किंवा मागणी नव्हे.

इन्फो

मिटकरींचे बोलणे तेढ निर्माण करणारे

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान प्रकरणात केलेले वक्तव्य हे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते सर्व भाषणात सांगितले, ते समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. पवार साहेबांनीच त्यांना योग्य कानमंत्र द्यावा, असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन