शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भोंगे हटवण्याची मागणीच नव्हती निर्णय कसा घेणार? : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 01:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्मरण झाल्याची कारणमिमांसा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या भोंग्यांसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,हीच आमची पूर्वी पासूनची भूमिका आहे. मात्र,आमच्या सरकारच्या काळात भोंग्यांबाबत माध्यमांनी किंवा अन्य पक्षांनी मागणी केली नसल्याने त्याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याचे भाजपचे नाशिक प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.२७) सांगितले.

 

राणा यांनी नोंदविलेला आक्षेप हा खार पोलीस ठाण्यातील नसून सांताक्रूज पोलीस ठाण्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या आराेपासंदर्भातील मुद्द्यांची तपासणी करायची असल्यास सांताक्रूज पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केेले. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई होत नाही, हा आक्षेप चुकीचा असून ज्यांच्याबाबत आक्षेप आहे, त्यांच्याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यास ईडीकडून त्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात असेल तर त्यांची चौकशी होईल, असेही महाजन यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, रंजना भानसी, सुजाता करजगीकर, प्रशांत जाधव, सुनील केदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

इन्फो

पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरीचा नवीन पॅटर्न सत्ताधारी हे पोलिसांना हाताशी धरून किंवा पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी करीत असल्याचे आघाडी शासनाच्या काळात दिसून येत आहे. जर तुम्ही राज्य शासनाच्या विरोधात बोललात तर हल्ला चढवू अशाच प्रकारचे कामकाज सध्या राज्यात सुरू असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. वाटेल ते गुन्हे नोंदवायचे, त्यासाठी पोलिसांचा वापर करायचा. माझ्याबाबतही तेच झालं असून

पेन ड्राईव्ह मधून सत्य समोर आले असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.

इन्पो

राष्ट्रपती राजवट लावण्याची भूमिका नाही

राज्यातील घटनाक्रम पाहता खोटे बोला पण रेटून बोला अशा प्रकारची राज्य शासनाची कार्यपद्धती आहे. राज्यातली स्थिती योग्य नाही.

 

मंत्री जेल मध्ये,हल्ले करायचे,फक्त राजकारण करायचे हेच सुरू आहे. दरोडा पडला तरी भाजपा,चोरी झाली तरी भाजपा, बलात्कार झाला तरी भाजपा असे काही झालं की भाजपकडे बोट दाखवायचे असे प्रकार सुरू आहे. तरीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी,अशी आमची भूमिका किंवा मागणी नव्हे.

इन्फो

मिटकरींचे बोलणे तेढ निर्माण करणारे

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान प्रकरणात केलेले वक्तव्य हे समाजात तेढ निर्माण करणारे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ते सर्व भाषणात सांगितले, ते समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. पवार साहेबांनीच त्यांना योग्य कानमंत्र द्यावा, असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन