कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गांभीर्य नाही
By Admin | Updated: January 10, 2015 00:20 IST2015-01-10T00:20:29+5:302015-01-10T00:20:57+5:30
कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गांभीर्य नाही

कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गांभीर्य नाही
त्र्यंबकेश्वर : बारा वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा जागतिक महोत्सव असून, देश-विदेशातून लोक येत असतात. मागच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकला १५ लाखांपर्यंत भाविक आले होते. यावेळेस प्रशासनाने गर्दीत वाढ होईल, असे सूतोवाच केले आहे. असे सर्व असतानाही शासन त्र्यंबक नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी केला आहे.
ते म्हणाले की, त्र्यंबकसाठी वाढीव निधी मंजूर करण्याकरिता अनेकवेळा पाठपुरावा केला. तथापि शासनाकडून अद्याप काहीच हालचाली नाही साधूंनी ७० ते ७५ शेड्स मागितले होते.
निविदा निघाल्या फक्त २० शेड्सच्या पालिकेतर्फे ५० शेड्स मंजूर केल्या आहेत, आठ ठिकाणी कामे सुरू आहेत. दोन आखाड्यांकडे जागाच नसल्याने ते दोन आखाडे वगळून याठिकाणी कामे सुरू आहेत. उर्वरित शेड्सचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीवर अवलंबून असल्याचे पालिका अभियंता जुन्नरे यांनी सांगितले. टॉयलेटसाठीही काही आखाड्यात जागा नाही. कामांची परिस्थिती धीम्या गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हवे तेवढे लक्ष दिले जात नाही. अर्थात आपुरा निधी त्यात कामांची काटछाट करून त्र्यंबक पालिकेला अवघे ३५ कोटी (३४.६९ कोटी) दिले. अन्य ठिकाणी ७० ते ७५ कोटी दिले जातात, तर मग कुंभमेळा हा जागतिक महोत्सवाची जबाबदारी शासनाची नाही काय? असा सवालही सागरानंद यांनी उपस्थित केला. शिखर समितीतील फक्त अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बैठक घेतली. शिखर समितीत साधू-महंत व पालिका मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असताना कोणतेही निमंत्रण नव्हते याबद्दलही नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)