शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 14:32 IST

कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे.

ठळक मुद्देतहसिलदारांकडून भेट : तज्ज्ञांना करणार पाचारणगेल्या ४८ तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवटसह पाच ते सहा गावांना भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भयभयीत वातावरण झालेले असले तरी, राज्यातील कानाकोप-यातील भुगर्भातील हालचालींची नोंद ठेवणाºया ‘मेरी’च्या भुकंप मापक यंत्रावर मात्र गेल्या ४८ तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. ‘सुपर सोनीक बुम’मुळे धक्के जाणवल्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही, तथापि, जनतेत निर्माण झालेली भिती पाहता तहसिलदार कैलास चावडे यांनी तातडीने संबंधित गावांना भेटी देवून जनतेचे प्रबोाधन केले आहे.कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे. शनिवार व रविवारी पुन्हा धक्के बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी तालुक्यातीलच ओतुर येथेही मध्यरात्री भुकंपाचे जोरदार धक्के बसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते, परंतु प्रत्यक्षात त्याची भुकंप मापक यंत्रावर नोंद झाली नव्हती. त्यामुळे प्रशासन त्या धक्क्यांना भुकंपाचे धक्के मानण्यास तयार नव्हती, मात्र ओतुर व परिसरातील नागरिकांनी त्यानंतर किती तरी दिवस रात्रीच्या वेळी घराबाहेरच झोपणे पसंत केले होते. कळवण तालुक्यात सातत्याने जमीनीला बसणाºया हादºयांबाबत यापुर्वी ‘मेरी’ या संशोधन संस्थेच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देवून पाहणी केली आहे, परंतु अंतीम निष्कर्ष कधीच निघाला नाही, तथापि, भुकंपाचे धक्के साधारणत: पावसाळा संपल्यानंतर दिवाळी सणाच्या आसपास बसत असल्याचे आजवरच्या घटनांमधून लक्षात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत मुरून भुगर्भागील हालचालींमुळे अंतर्गत पोकळी निर्माण होऊन धक्के जाणवत असावे असे जाणकारांचे म्हणणे आहे. चार वर्षापुर्वी अशाच धक्क्यांची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असता, दिल्ली व कोलकत्ता येथील भुगर्भ शास्त्रज्ञांनी कळवण तालुक्यातील संवेदनशील गावांना भेटी देवून पाहणी केली होती, परंतु त्यातूनही फारसे काही होऊ शकले नाही.नागरिकांना अलिकडे जाणवलेले धक्के हे कदाचित ‘सुपर सोनीक बुम’ म्हणजेच आकाशात झेपावणाºया मोठ्या विमानांच्या डोंगर, दरी भागात मोठा आवाज होतो व त्या आवाजातूनच सदरचा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय