शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 14:32 IST

कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे.

ठळक मुद्देतहसिलदारांकडून भेट : तज्ज्ञांना करणार पाचारणगेल्या ४८ तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवटसह पाच ते सहा गावांना भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भयभयीत वातावरण झालेले असले तरी, राज्यातील कानाकोप-यातील भुगर्भातील हालचालींची नोंद ठेवणाºया ‘मेरी’च्या भुकंप मापक यंत्रावर मात्र गेल्या ४८ तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. ‘सुपर सोनीक बुम’मुळे धक्के जाणवल्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही, तथापि, जनतेत निर्माण झालेली भिती पाहता तहसिलदार कैलास चावडे यांनी तातडीने संबंधित गावांना भेटी देवून जनतेचे प्रबोाधन केले आहे.कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे. शनिवार व रविवारी पुन्हा धक्के बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी तालुक्यातीलच ओतुर येथेही मध्यरात्री भुकंपाचे जोरदार धक्के बसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते, परंतु प्रत्यक्षात त्याची भुकंप मापक यंत्रावर नोंद झाली नव्हती. त्यामुळे प्रशासन त्या धक्क्यांना भुकंपाचे धक्के मानण्यास तयार नव्हती, मात्र ओतुर व परिसरातील नागरिकांनी त्यानंतर किती तरी दिवस रात्रीच्या वेळी घराबाहेरच झोपणे पसंत केले होते. कळवण तालुक्यात सातत्याने जमीनीला बसणाºया हादºयांबाबत यापुर्वी ‘मेरी’ या संशोधन संस्थेच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देवून पाहणी केली आहे, परंतु अंतीम निष्कर्ष कधीच निघाला नाही, तथापि, भुकंपाचे धक्के साधारणत: पावसाळा संपल्यानंतर दिवाळी सणाच्या आसपास बसत असल्याचे आजवरच्या घटनांमधून लक्षात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत मुरून भुगर्भागील हालचालींमुळे अंतर्गत पोकळी निर्माण होऊन धक्के जाणवत असावे असे जाणकारांचे म्हणणे आहे. चार वर्षापुर्वी अशाच धक्क्यांची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असता, दिल्ली व कोलकत्ता येथील भुगर्भ शास्त्रज्ञांनी कळवण तालुक्यातील संवेदनशील गावांना भेटी देवून पाहणी केली होती, परंतु त्यातूनही फारसे काही होऊ शकले नाही.नागरिकांना अलिकडे जाणवलेले धक्के हे कदाचित ‘सुपर सोनीक बुम’ म्हणजेच आकाशात झेपावणाºया मोठ्या विमानांच्या डोंगर, दरी भागात मोठा आवाज होतो व त्या आवाजातूनच सदरचा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय