शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल, असा दावा करतानाच कॉँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही व तसा प्रयत्नही सुरू नसल्याचा निर्वाळा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला  आहे.नाशिक येथे उत्तर महाराष्टÑातील कॉँगे्रस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी थोरात बोलत होते. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली हे मान्य मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहिती नाही. असे सांगून थोरात यांनी, सध्या भाजपकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात असून, त्यातील काहींना चौकशीची भीती आहे, तर काहींना लोकसभा निवडणुकीनंतरअसुरक्षित वाटू लागल्याने ते भाजपत प्रवेश करीत आहेत, मात्र बाहेरच्या लोकांच्या येण्याने मूळ भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येदेखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.‘आमचे काय’ असा प्रश्न ते विचारू लागले असून, एकनाथ खडसे यांचे विधीमंडळातील भाषण हा त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले. कॉँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांनी जावे, त्यांना अडवणार नाही, असे सांगून थोरात यांनी, पक्षावर अशा प्रकारे परिस्थिती पहिल्यांदाच ओढवलेली नाही. यापूर्वीही अशा प्रसंगाना पक्ष सामोरे गेला व नव्याने उभारी घेऊन उभा राहिला आहे. जे गेले त्यांच्या ऐवजी नव तरुणांना संधी देऊन ही उणीव आपण भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताबद्दल बोलताना थोरात यांनी त्या निव्वळ वावड्या असल्याचे सांगितले व अशा प्रकारचा प्रचार करण्यात भाजपाच अग्रस्थानी असून, त्यांच्या रणनितीचा तो भाग असल्याचा आरोप केला. देशपातळीवर होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी असून, गरीब, अल्पसंख्याक समाजावर हल्ले, धमक्या देण्याचे प्रकार घडू लागले आहेत, त्याचे समर्थक कोणी करू नये. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी पुढाकार घ्यावा व मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली असून, जागोजागी मेळावे, बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत आहोत, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरल्याचे समजू शकतो. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले व सर्वांना बरोबर घेऊन चालणाºया उमेदवारांना पक्ष संधी देईल, असेही थोरात यांनी शेवटी सांगितले. यावेळी प्रभारी चांद रेड्डी, मुजफ्फर हुसेन, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवतेशिवसेना व भाजपत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना थोरात यांनी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, मराठवाडा, विदर्भात अद्यापही पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत आला आहे, आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अशी परिस्थिती असताना सत्तेतील लोक मुख्यमंत्रिपदाची चर्चा करतातच कशी असा प्रश्न केला. सरकारने दुष्काळी परिस्थितीवर लक्ष द्यावे, तसेही मुख्यमंत्री कोण हे शेवटी जनताच ठरवत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसMNSमनसे