शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल, असा दावा करतानाच कॉँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही व तसा प्रयत्नही सुरू नसल्याचा निर्वाळा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला  आहे.नाशिक येथे उत्तर महाराष्टÑातील कॉँगे्रस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी थोरात बोलत होते. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली हे मान्य मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहिती नाही. असे सांगून थोरात यांनी, सध्या भाजपकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात असून, त्यातील काहींना चौकशीची भीती आहे, तर काहींना लोकसभा निवडणुकीनंतरअसुरक्षित वाटू लागल्याने ते भाजपत प्रवेश करीत आहेत, मात्र बाहेरच्या लोकांच्या येण्याने मूळ भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येदेखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.‘आमचे काय’ असा प्रश्न ते विचारू लागले असून, एकनाथ खडसे यांचे विधीमंडळातील भाषण हा त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले. कॉँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांनी जावे, त्यांना अडवणार नाही, असे सांगून थोरात यांनी, पक्षावर अशा प्रकारे परिस्थिती पहिल्यांदाच ओढवलेली नाही. यापूर्वीही अशा प्रसंगाना पक्ष सामोरे गेला व नव्याने उभारी घेऊन उभा राहिला आहे. जे गेले त्यांच्या ऐवजी नव तरुणांना संधी देऊन ही उणीव आपण भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताबद्दल बोलताना थोरात यांनी त्या निव्वळ वावड्या असल्याचे सांगितले व अशा प्रकारचा प्रचार करण्यात भाजपाच अग्रस्थानी असून, त्यांच्या रणनितीचा तो भाग असल्याचा आरोप केला. देशपातळीवर होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी असून, गरीब, अल्पसंख्याक समाजावर हल्ले, धमक्या देण्याचे प्रकार घडू लागले आहेत, त्याचे समर्थक कोणी करू नये. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी पुढाकार घ्यावा व मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली असून, जागोजागी मेळावे, बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत आहोत, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरल्याचे समजू शकतो. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले व सर्वांना बरोबर घेऊन चालणाºया उमेदवारांना पक्ष संधी देईल, असेही थोरात यांनी शेवटी सांगितले. यावेळी प्रभारी चांद रेड्डी, मुजफ्फर हुसेन, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवतेशिवसेना व भाजपत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना थोरात यांनी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, मराठवाडा, विदर्भात अद्यापही पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत आला आहे, आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अशी परिस्थिती असताना सत्तेतील लोक मुख्यमंत्रिपदाची चर्चा करतातच कशी असा प्रश्न केला. सरकारने दुष्काळी परिस्थितीवर लक्ष द्यावे, तसेही मुख्यमंत्री कोण हे शेवटी जनताच ठरवत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसMNSमनसे