शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकही नाही ‘भाग्यश्री’ कन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:04 IST

एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

नाशिक : एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.  महाराष्टÑ शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुलींच्या सन्मानासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या आॅगस्टपासून या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातून एकाही लाभार्थ्याने अर्ज केलेला नाही. यामुळे मुलींच्या जन्मानंतरही वंशाचा दिवा म्हणून मुलांची वाट पाहिली जात असल्याचे यामुळे स्पष्ट होते. अर्थात हे ठामपणे सांगता येत नसले तरी या योजनेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या हेतूने शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली आहे. शासनाने या योजनेची व्याप्ती अधिक वाढविली असून, आता या योजनेत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे, अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाºयांना मुलीच्या नावे ५० हजार रुपये बॅँकेत जमा केले जातात.ज्या माता-पित्यांनी दुसºया मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केले असेल त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रुपये जमा केले जातात. यामध्ये या मुलींना वयाच्या सहा आणि बाराव्या वर्षी या रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला व्याजासह पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु त्यासाठी मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असली पाहिजे. वास्तविक सदर योजना ही एप्रिल २०१६ पासून लागू आहे. मात्र त्यावेळी या योजनेत केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच लाभ दिला जात होता. परंतु या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून, उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. सदर योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. योजना लागू झाली तेव्हा नाशिक जिह्यातून तब्बल २१ पालकांनी याचा लाभ घेतला होता. परंतु आता दीड वर्षात या योजनेसाठी कुणीही अर्ज केलेला नाही.मानसिकता बदलण्याची गरजपालकांची मानसिकता अजूनही बदलेली नाही हेदेखील यातून अधोरेखित झाले आहे. काहींनी पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा दुसºया अपत्याची वाट पाहिली आणि दुसरीही मुलगीच झाल्यानंतर काहींनी कुटुुंबनियोजन करीत योजनेचा लाभ घेतला, तर काहींना मुलगा झाल्यामुळे त्यांनी या योजनेचा विचारच केला नाही, असा निष्कर्ष आता महिला बालकल्याण विभागाने काढला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका