शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकही नाही ‘भाग्यश्री’ कन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:04 IST

एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

नाशिक : एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.  महाराष्टÑ शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुलींच्या सन्मानासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या आॅगस्टपासून या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातून एकाही लाभार्थ्याने अर्ज केलेला नाही. यामुळे मुलींच्या जन्मानंतरही वंशाचा दिवा म्हणून मुलांची वाट पाहिली जात असल्याचे यामुळे स्पष्ट होते. अर्थात हे ठामपणे सांगता येत नसले तरी या योजनेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या हेतूने शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली आहे. शासनाने या योजनेची व्याप्ती अधिक वाढविली असून, आता या योजनेत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे, अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाºयांना मुलीच्या नावे ५० हजार रुपये बॅँकेत जमा केले जातात.ज्या माता-पित्यांनी दुसºया मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केले असेल त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रुपये जमा केले जातात. यामध्ये या मुलींना वयाच्या सहा आणि बाराव्या वर्षी या रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला व्याजासह पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु त्यासाठी मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असली पाहिजे. वास्तविक सदर योजना ही एप्रिल २०१६ पासून लागू आहे. मात्र त्यावेळी या योजनेत केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच लाभ दिला जात होता. परंतु या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून, उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. सदर योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. योजना लागू झाली तेव्हा नाशिक जिह्यातून तब्बल २१ पालकांनी याचा लाभ घेतला होता. परंतु आता दीड वर्षात या योजनेसाठी कुणीही अर्ज केलेला नाही.मानसिकता बदलण्याची गरजपालकांची मानसिकता अजूनही बदलेली नाही हेदेखील यातून अधोरेखित झाले आहे. काहींनी पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा दुसºया अपत्याची वाट पाहिली आणि दुसरीही मुलगीच झाल्यानंतर काहींनी कुटुुंबनियोजन करीत योजनेचा लाभ घेतला, तर काहींना मुलगा झाल्यामुळे त्यांनी या योजनेचा विचारच केला नाही, असा निष्कर्ष आता महिला बालकल्याण विभागाने काढला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका