शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जिल्ह्यात एकही नाही ‘भाग्यश्री’ कन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:04 IST

एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

नाशिक : एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.  महाराष्टÑ शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुलींच्या सन्मानासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या आॅगस्टपासून या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातून एकाही लाभार्थ्याने अर्ज केलेला नाही. यामुळे मुलींच्या जन्मानंतरही वंशाचा दिवा म्हणून मुलांची वाट पाहिली जात असल्याचे यामुळे स्पष्ट होते. अर्थात हे ठामपणे सांगता येत नसले तरी या योजनेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या हेतूने शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली आहे. शासनाने या योजनेची व्याप्ती अधिक वाढविली असून, आता या योजनेत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे, अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाºयांना मुलीच्या नावे ५० हजार रुपये बॅँकेत जमा केले जातात.ज्या माता-पित्यांनी दुसºया मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केले असेल त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रुपये जमा केले जातात. यामध्ये या मुलींना वयाच्या सहा आणि बाराव्या वर्षी या रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला व्याजासह पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु त्यासाठी मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असली पाहिजे. वास्तविक सदर योजना ही एप्रिल २०१६ पासून लागू आहे. मात्र त्यावेळी या योजनेत केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच लाभ दिला जात होता. परंतु या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून, उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. सदर योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. योजना लागू झाली तेव्हा नाशिक जिह्यातून तब्बल २१ पालकांनी याचा लाभ घेतला होता. परंतु आता दीड वर्षात या योजनेसाठी कुणीही अर्ज केलेला नाही.मानसिकता बदलण्याची गरजपालकांची मानसिकता अजूनही बदलेली नाही हेदेखील यातून अधोरेखित झाले आहे. काहींनी पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा दुसºया अपत्याची वाट पाहिली आणि दुसरीही मुलगीच झाल्यानंतर काहींनी कुटुुंबनियोजन करीत योजनेचा लाभ घेतला, तर काहींना मुलगा झाल्यामुळे त्यांनी या योजनेचा विचारच केला नाही, असा निष्कर्ष आता महिला बालकल्याण विभागाने काढला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका