शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

..मग, कर्जमाफीचे पैसे गेले कुठे? :  उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:18 IST

मुख्यमंत्री कोण व्हावा, सत्तावाटप कसे असावे, हे आम्ही, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही. कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गेले कुठे,

नांदगाव : मुख्यमंत्री कोण व्हावा, सत्तावाटप कसे असावे, हे आम्ही, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांनी ठरवले आहे. त्यामुळे त्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही. कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गेले कुठे, असा सवाल करत दोन निवडणुकांच्या मधल्या काळात कर्जमाफी, विमा योजनांचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नसतील तर त्या पोहोचवाव्यात, यासाठी महाराष्ट्रभर फिरून शिवसेना मदत केंद्र कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना केले.ठाकरे यांचे चार तास उशिराने आगमन झाले. यावेळी त्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाला मोफत बियाणे व फवारणी पंपवाटप करण्यात आले. त्यानंतर मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी सांगितले, मिळालेली सत्ता आम्ही लोकांसाठीच वापरू. कर्जमाफीचे पैसे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बँकांना दिले; पण ते शेतकºयांपर्यंत पोहोचले नाहीत. मग गेले कुठे, असा प्रश्न करून ते म्हणाले की, विमा योजना अतिशय चांगली आहे. मात्र त्यात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या विम्याची रक्कम शेतकºयांना देत नसतील तर आम्ही ती वसूल करू. आमच्या सरकारच्या योजना नक्कीच चांगल्या आहेत. परंतु त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत. असे का घडते याची माहिती घेण्यासाठी तसेच शेतकºयांना कर्जमाफी मिळावी यासाठी व विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळावी अशा अनेक उद्देशांसाठी महाराष्ट्रभर शिवसेनेने मदत केंद्र उघडली आहेत. निवडणुका येतील आणि जातील, लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकांच्या मधल्या काळात शेतकरी कर्जमुक्त करावयाचा आहे. सामाजिक बांधिलकीतून शेतकºयांसाठी अनेक कामे शिवसेनेने सुरू केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.व्यासपीठावर रवींद्र मिर्लेकर, खासदार हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, बापूसाहेब कवडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार जगन्नाथ धाञक, संभाजी पवार, मंगला भास्कर, भारती जाधव, नगराध्यक्ष राजेश कवडे, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, अलताफ शेख, चेअरमन तेज कवडे, पंचायत समिती सभापती विद्यादेवी पाटील, राजेंद्र आहिरे, माजी सभापती विलास आहेर, गणेश धात्रक, विष्णू निकम, नगरसेवक किरण देवरे, गटनेते सुभाष कुटे, अ‍ॅड. सचिन साळवे, प्रमोद शुक्ला, चंद्रकांत शिंदे, भास्करराव ठोंब, सुनील जाधव, फरान शेख, प्रमोद भाबड, दशरथ बच्छाव आदी उपस्थित होते.विमा कंपन्यांना धडा शिकवूआम्ही मुख्यमंत्रिपदाची गाजरं खात बसायची आणि ज्यांनी गाजरं पिकवायची तो शेतकरी मात्र उपाशीच राहायचा, असे होणार नाही. शिवसेनेने त्यांच्यासाठी मदत केंद्र उभी केली आहेत. १५ दिवसांत विमा कंपन्यांनी मदत केली नाही तर विमा कंपनींना धडा शिकवू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला....तर जुनी शिवसेना दाखवावी लागेलयावेळी खासदार संजय राऊत यांनी सांगितले, सभागृहात घोषणा करून प्रश्न सुटत नाहीत. बँका पैसे देणार नसतील तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. पैसा देण्यात अडचणी निर्माण करणाºयांना जुनी शिवसेना दाखवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्याचा उल्लेख करून पीकविमा, पीक कर्ज, कर्जमाफी केवळ शिवसेनेच्या पुढाकारामुळे झाले. अगदी एक लाखाच्या ऐवजी दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली याचे श्रेय शिवसेनेला असल्याचे सांगितले. बापूसाहेब कवडे यांनी चारा छावण्यांना मिळणारी आर्थिक मदत तोकडी असून, बोंडअळीच्या अनुदानाची फक्त ४० टक्केच रक्कम लोकांना मिळाली. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे. ३५ हजार कोटींची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्यामुळे सरकारला करावी लागली असली तरी प्रत्यक्षात १३ हजार कोटीच मिळाल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी करंजवण पाणीपुरवठा योजनेत लोकवर्गणीचे ४८ कोटी रु पये शासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना