शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्याने 18 गुंठ्यात रताळ्याचे पीक घेतले, चारच महिन्यात 2 लाख कमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:05 IST

विशेष म्हणजे एका एका रताळाचे वजन थोडेथिडके नाही तर तब्बल साडेसहा ते सात किलोपर्यंत होते

नाशिक - जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील भरवीर येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांनी लागवडीची पारंपारिक पद्धत बदलत वाफ्याऐवजी बेड पद्धतीने केवळ 18 गुंठे क्षेत्रात लागवड केली. यंदा त्यांनी रताळ्याच्या पिकातून लाखोंची कमाई केली. रघुनाथ या शेतकऱ्याला 4 ते 5 महिन्यात दोन लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. शेती हा मान्सुन पावसाचा जुगार मानला जातो. मात्र, आधुनिक पद्धतीने आणि प्रयोगशील शेती केल्यास शेती हा नफा कमावून देणारा व्यवसाय असल्याचे रघुनाथ यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.  

विशेष म्हणजे एका एका रताळाचे वजन थोडेथिडके नाही तर तब्बल साडेसहा ते सात किलोपर्यंत होते. तसेच हा माल मनमाड मालेगाव येथील बाजारपेठांमध्ये विकला असून त्यांच्या या मालाला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल, वीस रुपये किलोचा दर मिळाला. रघुनाथ यांना अठरा गुंठ्यामध्ये सुमारे दहा टनांच्या आसपास उत्पन्न मिळाले. तसेच हा माल महाशिवरात्रीपूर्वीच जागोजागी विकला गेला. महाशिवरात्रीच्या उपवासाला रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. यामुळे या काळात रताळ्यांना चांगली मागणी असते हीच बाब लक्षात घेऊन भरवीर येथील शेतकरी रघुनाथ जाधव यांनी आपल्या घरा मागील 18 गुंठे क्षेत्रात चार महिन्यापूर्वी रताळ्याची लागवड केली होती. 

या पिकाला संपूर्ण शेणखताचा आणि पोषक विद्राव्य खतांचा वापर केला त्यांना साधारण सात ते आठ हजार रुपये खर्च आला. या पिकाला पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्यात सरासरी लागते. तसेच या रताळ्याच्या मालाचा प्रकार पाहून शेतकरी आचार्यचकीत झाले व आजूबाजूलादेखील आम्ही हे लावू असा प्रकारची चर्चा होऊ लागली. यासंदर्भात शेतकरी रघुनाथ जाधव यांनीही काही शेतकऱ्यांना अधिकची माहिती दिली 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीchandvad-acचांदवड