शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला शेतकऱ्यांचा वीजप्रश्नी रास्ता राेको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 01:35 IST

कळवण :तालुक्यात महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

कळवण : तालुक्यात महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांना देण्यात आले.

कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही. या चार तासांत अनेक वेळा वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेत पिकाला लागवडीपासून ते खते, औषधे, मजूर यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात; परंतु विजेअभावी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे कळवण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

आंदोलनात युवा तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, भाईदास पाटील, काशीनाथ गुंजाळ, शरद गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, विलास बस्ते, भारत पवार आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

इन्फो

या आहेत मागण्या!

निवेदनात शेतकऱ्यांना किमान दिवसातून दहा तास वीजपुरवठा मिळावा, सिंगल फेजमध्ये ट्रिप होणारी लाइन बंद करावी, सक्तीची वीज वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे अगोदर शासनाकडून वीज वसुली करून नंतर शेतकऱ्यांकडून वसुली करावी, तसेच पाळे, हिंगळवाडीसह संपूर्ण ग्रामीण भागात वीजपुरवठा पूर्ववत करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagitationआंदोलन