शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला शेतकऱ्यांचा वीजप्रश्नी रास्ता राेको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 01:35 IST

कळवण :तालुक्यात महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

कळवण : तालुक्यात महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना कमी वेळ वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी बांधवांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली, तसेच तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता रामराव राठोड यांना देण्यात आले.

कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावांमध्ये शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा आठ तासांऐवजी फक्त चारच तास मिळत असून तोसुद्धा पूर्ण वेळ राहत नाही. या चार तासांत अनेक वेळा वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेत पिकाला लागवडीपासून ते खते, औषधे, मजूर यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात; परंतु विजेअभावी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे कळवण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

आंदोलनात युवा तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, भाईदास पाटील, काशीनाथ गुंजाळ, शरद गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, विलास बस्ते, भारत पवार आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

इन्फो

या आहेत मागण्या!

निवेदनात शेतकऱ्यांना किमान दिवसातून दहा तास वीजपुरवठा मिळावा, सिंगल फेजमध्ये ट्रिप होणारी लाइन बंद करावी, सक्तीची वीज वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे अगोदर शासनाकडून वीज वसुली करून नंतर शेतकऱ्यांकडून वसुली करावी, तसेच पाळे, हिंगळवाडीसह संपूर्ण ग्रामीण भागात वीजपुरवठा पूर्ववत करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagitationआंदोलन