शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

विद्यार्थ्यांना शाळेतही मिळणार पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:17 AM

राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके देण्याच्या कार्यपद्धतीत बदल करून आता दुकानातून पुस्तके घेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याचवेळी शिक्षण संस्थांनाही व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण संस्थांना संधी दिल्याने विद्यार्थी पाठ्यपुस्तकांच्या दुकानात कसे फिरकणार, असा प्रश्न केला जात आहे.

ठळक मुद्देशिक्षण संस्थांनाही व्यवसायाची संधी डीबीटी अंतर्गत थेट खात्यात पैसे जमा होणार संस्थांना अधिकृतरीत्या व्यवसायाची संधी

नाशिक : राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तके देण्याच्या कार्यपद्धतीत बदल करून आता दुकानातून पुस्तके घेण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्याचवेळी शिक्षण संस्थांनाही व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण संस्थांना संधी दिल्याने विद्यार्थी पाठ्यपुस्तकांच्या दुकानात कसे फिरकणार, असा प्रश्न केला जात आहे.  सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ही सर्व शाळांना दिली जातात आणि शाळा त्यांचे विद्यार्थ्यांना थेट वितरण करीत असते. तत्पूर्वी ही पुस्तके मुलांना स्वखर्चाने पाठपुस्तकांच्या दुकानातून खरेदी करीत होते. परंतु आत राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यात नवा निर्णय घेतला असून, त्यानुसार पहिली ते आठवी तसेच नववी ते बारावीपर्यंतची पुस्तके विद्यार्थ्यांनी शाळेऐवजी पाठ्यपुस्तकांच्या दुकानात विकत घ्यावी त्या बदल्यात संबंधित विद्यार्थ्यांना थेट हस्तांतरण योजनेअंतर्गत म्हणजेच डीबीटी अंतर्गत थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाठ्यपुस्तकांच्या विक्री व्यवहाराअभावी नाराज असलेल्या पुस्तकविक्रेत्यांना पुन्हा एकदा व्यवसायाची संधी मिळणार आहे, परंतु असे करताना राज्य शासनाच्या भांडार व्यवस्थापकांनी २४ आॅक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार पाठ्यपुस्तक महामंडळ आणि शैक्षणिक संस्थांनादेखील पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के वटाव देण्यात येत असल्याचे नमूद करून त्यांनाही अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.  शहरातील अनेक शैक्षणिक संस्था पुस्तकेच नव्हे तर अन्य शैक्षणिक साहित्य शाळेतूनच विकतात आणि व्यवसाय करतात, अशा संस्थांकडे कोणताही व्यवसाय परवाना किंवा अन्य कोणतेही कर भरले जात नाही, त्यामुळे अशा संस्थांना अधिकृतरीत्या व्यवसायाची संधीच शासनाने उपलब्ध करून दिली आहे. शाळांनी पाठपुस्तकांबरोबरच अन्य साहित्य, अवांतर पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली तर त्यावर कोणाचे नियंत्रण राहणार? असा प्रश्न केले जात आहे. मुळात शासनाने अशाप्रकारचा निर्णय घेतल्याने पुस्तकविक्रेत्यांना त्याचा कोणताही लाभ होणार नसून त्यामुळे शासनाच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी